शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक्झिट पोल दिशाभूल करणारे, इंडिया आघाडीचे सरकार येणार : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:33 IST

आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नारायण गावस 

पणजी: एक्झिट पोल जरी भाजपच्या बाजूने असले तरी देशात उद्या इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी कुठल्याच दबावाखाली येऊन काम करु नये, आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत कॉँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर व इतर उपस्थित होते.

हे एक्झिट पोल चुकीचे आहे. कुठलाच अभ्यास न करता काही प्रसारमाध्यमांंवर दबाव आणून हे एक्झिट पोल करायला लावले आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा एक्झिट पोल आहे. कुठल्याच निवडूक कर्मचाऱ्यांनी या सरकारच्या दबावाखाली येऊ नये. आपले काम पारदर्शक करावे. उद्यापासून इंडिया आघाडी सरकार येणार असून भाजपला घरी जावे लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी एक्झिट पोल करुन फक़्त भाजपाची हवा केली आहे ही हवा उद्या जाणार आहे.

पाटकर म्हणाले, या भाजप सरकाच्या हुकुमशाहीला देशभरातील जनता कंटाळली होती. म्हणून लोकांनी यंदा माेठ्या प्रमाणात कॉँग्रेस व तसेच इंडिया आघाडीच्या उमेदवार केले आहे. या भाजप सरकारने गेल्या १० वर्षात देशाच्या जनतेची फसवणूक केली आहे. आता निवडणुकांच्या काळात या सरकारने लाेकांना दिलेली आश्वासने खाेटी आहे. पण भाजपच्या या भूलथापांना आता देशाची जनता बळी पडलेली नाही.

पाटकर म्हणाले, भाजपचे नेते ४०० पारचा नारा देत होते पण आता त्यांना कळाले आहे त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत होणार आहे. देशभर आता कॉँग्रेसचे वारे आहे. त्यामुळे आता भाजपचे हुकूमशाही चालणार नाही. उद्यापासून नरेंद्र मोदी सरकार जाणार असून कॉँग्रेसचे सरकार देशात राज्य करणार आहे.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस