शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नीलेश काब्राल यांना वगळून आलेक्स सिक्वेरांना मंत्रिपद? मंत्रिमंडळात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:11 IST

अनेक मंत्र्यांचा बांधकाममंत्र्यांना पाठिंबा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पुढील महिन्यात, ३ डिसेंबरनंतर गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल, अशी माहिती मिळाली आहे. बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना डच्चू देऊन त्याजागी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना संधी दिली जाऊ शकते.

या विषयावरून मंत्रिमंडळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. काब्राल यांच्या बाजूने बहुतांश मंत्री असून, काब्राल यांना डच्चू दिला जाऊ नये, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. काब्राल हे नुकतेच दिल्लीला जाऊन आले. त्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी बोलावले होते. त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल, याची कल्पना आलेली असू शकते, अशी चर्चा काही मंत्र्यांमध्ये पसरली आहे. आलेक्स सिक्वेरा यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे आपल्याला मंत्री करा, असा तगादा सिक्वेरा यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे लावला होताच. सिक्वेरा यांची मागणी मान्य होईल, असे दिसते. 

सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतरच सावंत मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे. या अनुषंगाने राजकीय हालचालींना गती आली आहे. सावंत मंत्रिमंडळात सध्या माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल व बाबू मोन्सेरात हे तीन ख्रिस्ती मंत्री आहेत. यापैकी माविन व बाबूश यांच्या आसनाला तूर्त तरी धोका नाही. काब्राल यांना दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदावर गदा येणार हे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने दक्षिण गोवा मतदारसंघात ख्रिस्ती बांधवांची मते मिळवण्यासाठी सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती आमदाराला मंत्रिपद देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार नुवेचे काँग्रेसचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे निश्चित झाल्याचीही माहिती मिळते. 

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, तेव्हा ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिले होते. परंतु वर्ष उलटले तरी सिक्वेरा यांना मंत्रिपद मिळालेले नाही. सावंत मंत्रिमंडळात सासष्टीचा एकही मंत्री नाही. या तालुक्यात ख्रिस्ती आमदाराला मंत्रिपद दिल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी भाजपला त्याचा फायदा होईल, असे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भावना बनली आहे.

दरम्यान, काब्राल यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, मंत्रिमंडळातून आताच कोणाला वगळून पक्षाने निवडणुकीआधीच वातावरण बिघडवू नये, त्याऐवजी प्रत्येक आमदार, मंत्र्याला लोकसभेसाठी दोन्ही जागांवर भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी टार्गेट द्यावे. त्यासाठी हवी तर सक्त ताकीद द्यावी. सध्या ३३ आमदार सत्तेत आहेत. सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल्यास लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकता येतील.

काब्राल म्हणाले की, भाजपने कधीच हिंदू, ख्रिस्ती असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे ख्रिस्ती आमदाराला मंत्री करण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला वगळणे हे मला पटत नाही. एका प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मंत्रिमंडळातून कोणाला काढावे किंवा कोणाचा समावेश करावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे.

माझे असे वैयक्तिक मत आहे की, कोणालाही मंत्रिमंडळातून वगळण्याआधी त्या मंत्र्याची कार्यक्षमता तपासावी. संबंधित मंत्री लोकांसाठी उपलब्ध असतो का? तो कार्यक्षम आहे का? योग्य रीतीने काम करतो का? या गोष्टी तपासण्याची गरज आहे. एसटी, ओबीसी, हिंदू, ख्रिस्ती हे निकष लावून कोणालाही वगळू नये.

केंद्रीय नेतृत्वाला अहवाल सादर

कोणत्याही परिस्थितीत यावेळी लोकसभेची दक्षिण गोव्याची जागा गमवायची नाही, असे पक्षाने ठरवले आहे. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. अलीकडेच चंद्रशेखर यांनी गोव्यात भेट देऊन आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली होती. त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला अहवालही सादर केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण