शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या खाण उद्योगात अजुनही मंदी, फक्त 6.8 दशलक्ष टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 14:23 IST

गोव्याचा खाण धंदा हा काही वर्षापूर्वी प्रचंड फळफळला होता पण आता या उद्योगात मंदी व्यापून राहिली आहे.

पणजी : गोव्याचा खाण धंदा हा काही वर्षापूर्वी प्रचंड फळफळला होता पण आता या उद्योगात मंदी व्यापून राहिली आहे. काहीच मोठ्या खनिज कंपन्या अजुनही नफा कमावित असल्या तरी, या मोसमात डिसेंबरच्या अखेर्पयत केवळ 6.8 दशलक्ष टन एवढेच खनिज उत्पादन झाले आहे. प्रत्यक्षात 7.8 दशलक्ष टन उत्पादनाची अपेक्षा होती.

गोवा सरकारच्या खाण खात्याने एकूण 45 खनिज लिजांचे 2016 साली नूतनीकरण करून दिले पण त्यापैकी फक्त बारा-तेरा खनिज खाणी सध्या सुरू आहेत. सांगे, सत्तरी व डिचोली या तालुक्यात प्रामुख्याने या खाणी चालतात. या व्यतिरिक्त सोनशी येथे एकूण तेरा खनिज खाणी पूर्वी चालू होत्या. मात्र त्या खाणींमुळे प्रदूषण वाढल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले. हा विषय न्यायालयातही पोहचला. परिणामी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तेरापैकी बारा खनिज खाणी बंद केल्या आहेत. त्यामुळेही गोव्याच्या एकूण खनिज उत्पादनाने अजून वेग घेतलेला नाही.

वेदांता-सेझा गोवा, फोमेन्तो, तिंबलो व व्ही. एम. साळगावकर अॅण्ड ब्रदर्स ह्या कंपन्यांकडून एरव्ही जास्त प्रमाणात गोव्याहून विदेशात खनिजाची निर्यात केली जाते. यावेळच्या मोसमात निर्यातीचे प्रमाण 70 टक्क्यांनी खाली आले आहे, असे गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे म्हणणो आहे. एरव्ही गोव्यातील सर्व खनिज लिजधारकांना वार्षिक 20 दशलक्ष टन खनिज उत्पादन करण्याची मर्यादा आहे. एवढा उत्पादन कोटा सर्वोच्च न्यायालयाने खाण कंपन्यांना ठरवून दिला आहे. मात्र यावेळी अजून तरी फक्त 6.8 दशलक्ष टन एवढय़ाच खनिजाचे उत्पादन झाल्यामुळे वीस दशलक्ष टन मर्यादा या मोसमात खाण कंपन्या गाठू शकतील असे दिसत नाही. खाण खात्याच्या अधिका:यांनाही अशीच शंका वाटते.

यावेळी गोव्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. त्यामुळे खनिज व्यवसाय उशिरा सुरू झाला. जूनपासून पावसाळ्य़ात खाण व्यवसाय बंद ठेवावा लागतो. खाण खात्याने सूचविलेल्या विविध उपायांमुळे सध्या धूळ व जल प्रदूषणाचे प्रमाण खाणपट्टयात कमी आहे, असा दावा खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी केला आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रदूषणाच्या विषयावर लक्ष ठेवले आहे. गोव्यातील खाण कंपन्यांनी वार्षिक उत्पादन मर्यादा 35 दशलक्ष टनांर्पयत वाढवून द्यावी अशी विनंती केली आहे. येत्या 24 रोजी सर्वोच्च न्यायालयात याविषयी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र खाण कंपन्या जास्त उत्पादन सध्या करूच शकत नसल्याने 35 दशलक्ष टनांर्पयत मर्यादा वाढवून देण्याची गरजच राहिलेली नाही असे पर्यावरणप्रेमींना वाटते.