शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"साक्षात देव जरी आला तरीही 100 टक्के सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत"

By हेमंत बावकर | Updated: October 31, 2020 19:46 IST

Government jobs: बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे.

पणजी : देशात आधीच बेरोजगारी त्यात कोरोना महामारीमुळे ज्यांना रोजगार होते त्यांनाही नोकऱ्या, कामधंदे गमावून बसावे लागण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारी नोकऱ्यांकडे पहिल्यापासूनच अनेकांचा ओढा असतो. सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवून असलेल्या तरुणांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजावले आहे. 

बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे. या काळात भाजपाच्याच दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्य़ांचे वक्तव्य आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेचे उद्घाटन केले. यानंतर ते ग्रामपंचायत प्रतिनिधींशी वेब कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत, असे सांगितले. 

उद्या जर देव मुख्यमंत्री बनून आला तरीही तो सर्वांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही, असे सावंत म्हणाले. 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेतून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे गॅझेटेड अधिकारी ग्राम पंचायतींचा दौरा करतील, तसेच खालच्या स्तरापर्यंत सरकारी योजन बनविण्याचे काम करतील. गावात उपलब्ध साधनांचाही अभ्यास केला जाणार आहे. यावरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

गोव्यामध्ये बेरोजगारी एक मोठी समस्या बनली आहे. येथे बेरोजगारी दर 15.4 टक्के आहे. सावंत यांनी सांगितले की राज्यातील बेरोजगारांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये रोजगार मिळायला हवा. राज्यात अनेक रोजगार आहेत मात्र, ते बाहेरील राज्यातील लोक मिळवत आहेत. यामुळे गावांतील बेरोजगारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत