शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दहावी नापासांनाही आता नोकरी - मुख्यमंत्री 

By किशोर कुबल | Updated: December 18, 2023 15:15 IST

अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत समकक्ष

पणजी :गोवा बोर्डाच्या शालांत किंवा उच्च माध्यमिक परीक्षेत नापास झाल्यास आता नोकरीसाठी चिंता करण्याचे कारण नाही. दहावी अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरुन उमेदवार नोकरीस पात्र ठरतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. पर्वरी येथे ४१ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोवा बोर्डाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,‘दहावी उत्तीर्ण होऊन दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला तरी बारावी उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरले जाईल. गोवा बोर्डाने बाह्य परीक्षा प्रक्रिया सुटसुटीत करावी, जेणेकरुन रिपीटर्सना संधी मिळेल. इतर राज्यांच्या बोर्डाकडून बोगस प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकारही बंद होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षण क्षेत्रात नोकऱ्यांसाठी नव्हे तर कौशल्यासाठी सुधारणा यायला हव्यात.’

४ गुणांनी एमबीबएस हुकले!

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘खरे तर मी एमबीबीएस डॉक्टर बनणार होतो. परंतु ४ गुण कमी मिळाल्याने प्रवेश हुकला व आयुर्वेदिक डॉक्टर झालो. दहावीत मला त्यावेळी ५९.५ टक्के गुण मिळाले होते. प्रथम श्रेणी अवघ्या ०.५ टक्क्यांनी हुकली. बारावीच्या परीक्षेत मला ७८ टक्के गुण मिळाले मात्र एमबीबीएस प्रवेश मिळाला नाही.’ दरम्यान, स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत