शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दहावी नापासांनाही आता नोकरी - मुख्यमंत्री 

By किशोर कुबल | Updated: December 18, 2023 15:15 IST

अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत समकक्ष

पणजी :गोवा बोर्डाच्या शालांत किंवा उच्च माध्यमिक परीक्षेत नापास झाल्यास आता नोकरीसाठी चिंता करण्याचे कारण नाही. दहावी अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरुन उमेदवार नोकरीस पात्र ठरतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. पर्वरी येथे ४१ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोवा बोर्डाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,‘दहावी उत्तीर्ण होऊन दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला तरी बारावी उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरले जाईल. गोवा बोर्डाने बाह्य परीक्षा प्रक्रिया सुटसुटीत करावी, जेणेकरुन रिपीटर्सना संधी मिळेल. इतर राज्यांच्या बोर्डाकडून बोगस प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकारही बंद होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षण क्षेत्रात नोकऱ्यांसाठी नव्हे तर कौशल्यासाठी सुधारणा यायला हव्यात.’

४ गुणांनी एमबीबएस हुकले!

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘खरे तर मी एमबीबीएस डॉक्टर बनणार होतो. परंतु ४ गुण कमी मिळाल्याने प्रवेश हुकला व आयुर्वेदिक डॉक्टर झालो. दहावीत मला त्यावेळी ५९.५ टक्के गुण मिळाले होते. प्रथम श्रेणी अवघ्या ०.५ टक्क्यांनी हुकली. बारावीच्या परीक्षेत मला ७८ टक्के गुण मिळाले मात्र एमबीबीएस प्रवेश मिळाला नाही.’ दरम्यान, स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत