शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातवा वेतन लागू करा : पंचायत कर्मचाऱ्यांची आझाद मैदानावर धरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2024 13:18 IST

पंचायत कर्मचाऱ्यांना २००८ साली सहावा वेतन लागू केला होता. पण अजून सातवा वेतन देण्यात आलेला नाही.

नारायण गावस

पणजी: पंचायत कर्मचाऱ्यांनी सरकारने सातवा वेतन लागू करावा या मागणीसाठी पणजी आझाद मैदानावर गुरुवारी धरणे आंदोलन केले. यावेळी राज्यभरातील विविध पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. आयटक या कामगार संघटनेच्या बॅनरखाली ही धरणे धरण्यात आली. यावेळी कामगार नेते ॲड. राजू मंगेशकार तसेच कामगार नेते ॲड. प्रसन्ना उट्टगी उपस्थित होते. 

  ॲड. राजू मंगेशकर म्हणाले पंचायत कर्मचाऱ्यांना २००८ साली सहावा वेतन लागू केला होता. पण अजून सातवा वेतन देण्यात आलेला नाही. इतर सरकारी कर्मचाऱ्यांना २०१६ पासून लागू झालेला सातवा वेतन दिला जात आहे. राज्यातील एकूण १९१ पंचायती असून यात सुमारे ७०० कर्मचारी आहेत. यात मदतनीस, कारकून तसेच लहान कामगार आहेत. पण या कामगारांची अजून सरकारने दखल घेतलेली नाही. या विषयी मुख्यमंत्री तसेच पंचायत मंत्र्यांशी चर्चा झाली होती. सातवा वेतन लागू करणार असे आश्वासन दिली होते. पण अजून पूर्ण करण्यात आलेले नाही.

ॲड. मंगेशकर म्हणाले, हे कामगार पंचायतीच्या कामाप्रमाणे बीएलओची ड्यूटी करतात. तसेच सरपंच, सचिव, तलाठी यांच्या दबावाखाली काम करतात. त्यांना सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या ऐकाव्या लागतात. काही राजकीय वरदहस्त असलेले लाेक त्यांना शिवीगाळही करतात. तरीही प्रामाणिकपणे हे कामगार काम करत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना इतर कामगारांप्रमाणे सातवा वेतन लागू करण्याची  गरज आहे. नाही तरी या सर्व कामगारांनी संप केलातर राज्यातील सर्व पंचायती बंद करण्याची सरकारवर पाळी येणार आहे,  असेही ॲड. मंगेशकर म्हणाले.