शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

योजनांतून महिलांचे सशक्तीकरण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:48 IST

आर्थिक समावेशनविषयक 'अनुभूती' राष्ट्रीय मेळाव्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्यातून त्यांना सन्मानाचे जीवन प्रदान केले गेले आहे. डबल इंजिन सरकारमुळे गेल्या अकरा वर्षात केवळ मूलभूत पायाभूत सुविधांचाच नव्हे तर मानव संसाधन विकासही झाला आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मिरामार येथे आयोजित 'अनुभूती - आर्थिक समावेशन : समृद्धीचा मार्ग' या राष्ट्रीय मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्मृती शरण, ग्रामीण विकास सचिव संजय गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्र सरकारची प्रत्येक योजना महिला सबलीकरणासाठी आणली जात आहे. स्वयंपूर्णता, विश्वास आणि प्रतिष्ठा यावर भर दिला जात आहे.या निमित्ताने ग्रामीण विकासावर विचारमंथन होईल तेव्हा महिलांचा उत्कर्ष केंद्रबिंदू असावा. मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेल्या ६० वर्षात महिला सक्षमीकरणासाठी गंभीरपणे विचार झालाच नाही. परंतु केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्याला चालना मिळाली. दारिद्रय निर्मूलनासाठीही मोदी यांनी विविध योजना आणल्या.

तीन दिवस विचारमंथन

'अनुभूती' मेळावा पुढील तीन दिवस चालणार असून, वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी दाखल झालेले आहेत. ग्रामीण विकासाबाबत मेळाव्यात विचारमंथन होणार आहे.

जोडल्या ४८ हजार महिला

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात रूरल मिशन सुरू झाल्यापासून ३२५० महिला सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन झाले. ४८ हजार महिला या ग्रुपशी निगडित आहेत. ११२० महिला सेल्फ हेल्प ग्रुपनी कर्ज घेऊन व्यवसाय केला. सुमारे ३५० कोटी रुपयांची उलाढाल अल्पावधीत झालेली आहे. राज्यात ४२० नोंदणीकृत गावे आहेत. पैकी २१० ठिकाणी म्हणजेच ५० टक्के गावांमध्ये ग्राम संघटना स्थापन झालेल्या आहेत. महिलांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत