शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2024 13:01 IST

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नैसर्गिक, प्राकृतिक व समूह शेतीवर भर देऊन आधुनिक तंत्राचा वापर करून कृषी क्षेत्रात अनेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. राज्यात कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचा आमचा निर्धार असून केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सूचना राज्यात तत्परतेने अंमलात आणून नवी क्रांती घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मिशनअंतर्गत प्राकृतिक शेती व समूह शेतीवर भर देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देताना नवयुवकांना शेतीची आवड निर्माण करून कुठेही जमीन पडीक राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या थेट संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी, कृषी अधिकारी १९१ पंचायतींचे सरपंच, सदस्य, १४ पालिका व शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वांना प्रेरणा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत अंतर्गत शेती, शेतकरी, उत्पादन यावर विशेष भर दिला असून हा मंत्र आम्ही तातडीने अमलात आणून गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी थेट संवाद साधताना कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केले. त्यांनी गोव्यात शेतीसंदर्भात केलेले प्रयोग देशातील इतर राज्यातही चालीस लावण्याची हमी दिली. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती