शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2024 13:01 IST

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नैसर्गिक, प्राकृतिक व समूह शेतीवर भर देऊन आधुनिक तंत्राचा वापर करून कृषी क्षेत्रात अनेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. राज्यात कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचा आमचा निर्धार असून केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सूचना राज्यात तत्परतेने अंमलात आणून नवी क्रांती घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मिशनअंतर्गत प्राकृतिक शेती व समूह शेतीवर भर देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देताना नवयुवकांना शेतीची आवड निर्माण करून कुठेही जमीन पडीक राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या थेट संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी, कृषी अधिकारी १९१ पंचायतींचे सरपंच, सदस्य, १४ पालिका व शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वांना प्रेरणा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत अंतर्गत शेती, शेतकरी, उत्पादन यावर विशेष भर दिला असून हा मंत्र आम्ही तातडीने अमलात आणून गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी थेट संवाद साधताना कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केले. त्यांनी गोव्यात शेतीसंदर्भात केलेले प्रयोग देशातील इतर राज्यातही चालीस लावण्याची हमी दिली. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती