शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लंपडाव तरी सरकार झोपलेले! आपचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:44 IST

राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे.

पणजी -  राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे. सरकारने केलेली वीज दरवाढ, वीज कर्मचारी क्वाटर्सची दुरुस्ती, मुख्य विद्युत अभियंताकडून पदभार मागे घेणे तसेच अविरत वीजपुरवठा देणे यासारख्या प्रमुख मागण्या करत सोमवारी (१० सप्टेंबर) आम आदमी पक्षातर्फे पणजीत विद्युत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी वीज दरवाढ व अभियंता रेड्डी यांना निवृत्तीनंतर दिलेल्या पदभार या सूचनापत्रांची होळी केली. तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य विद्युत अभियंता एन. निळकंठ रेड्डी यांना घेराव चार कलमी पानांचे निवेदन सादर केले. 

याविषयी आपचे गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स म्हणाले, राज्यातील प्रशासन ढासळले आहे. वीज मंत्री नसल्याने खात्याला वालीच उरलेला नाही. सातत्याने वीजेचा लंपडाव सुरु आहे. तरीही वीज दरवाढ केली जाते. चतुर्थीच्या काळात लोकांना अविरत वीजपुरवठा द्यावा, अशी आपची मागणी आहे. आज दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने घरपोच चाळीस प्रशासनसेवा सुरु केल्या. मात्र, गोव्यातील सरकारचे तीनतेरा वाजलेले आहे. वीज कर्मचाºयांच्या क्वाटर्सची दुरवस्था झालेली आहे. मुख्य विद्युत अभियंता रेड्डी हे निवृत्त झाले आहेत; तरीही त्यांच्याकडे वर्षभरासाठी अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या कृतीचा आपकडून निषेध व्यक्त केला जातो, असे त्यांनी सांगितले.

प्रदीप पाडगावकर म्हणाले, सोशल माध्यमातून खंडित वीजपुरवठ्याविषयी सामन्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कुडचडे, डिचोली, आल्त-बेती यासारख्या परिसरात वीज नसल्याने लोक हैरान झाले आहेत. आज सोमवारी सकाळपासून रायबंदर परिसरात वीजपुरवठा खंडित आहे. राज्यातील वीजउपकरणे ही निकामी व जुनी बनली आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर सुद्धा मुख्य अभियंता रेड्डी यांना पदभार दिला जातो. हे चुकीचे असून ते या पदाच्या लायक नाहीत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या वेळी आपच्या कार्यकर्त्यांना सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच रेड्डी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली.

 

कोट : 

खात्याकडे वीजपुरवठा खंडितच्या तशा तक्रारी येत नाहीत. ज्या येतात, त्यावर कारवाई केली जाते. १९१२ ही खात्याची हेल्पलाईन सेवा आहे. पण त्यावर तशा तक्रारी नाहीत. वीज कर्मचाºयांसाठी असणाºया क्वाटर्सच्या दुरुस्तीसाठी सरकारने दोन कोटी निधी मंजूर केला आहे. पावसाळ्यानंतर ही कामे हाती घेतली जातील. दोन क्वाटर्सची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यासाठी या संबंधितांचे स्थलांतर करून ते क्वाटर्स पाडून तिथे नवीन बांधकाम केले जाईल. नवीन मुख्य अभियंताला घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. विभाग पातळीवर कोणताही अधिकारी नसल्याने नवीन अभियत्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे केवळ पदभार सोपवला आहे. 

- एन. निळकंठ रेड्डी, मुख्य विद्युत अभियंता 

टॅग्स :electricityवीजgoaगोवा