शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

विजेचा लंपडाव तरी सरकार झोपलेले! आपचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:44 IST

राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे.

पणजी -  राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे. सरकारने केलेली वीज दरवाढ, वीज कर्मचारी क्वाटर्सची दुरुस्ती, मुख्य विद्युत अभियंताकडून पदभार मागे घेणे तसेच अविरत वीजपुरवठा देणे यासारख्या प्रमुख मागण्या करत सोमवारी (१० सप्टेंबर) आम आदमी पक्षातर्फे पणजीत विद्युत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी वीज दरवाढ व अभियंता रेड्डी यांना निवृत्तीनंतर दिलेल्या पदभार या सूचनापत्रांची होळी केली. तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य विद्युत अभियंता एन. निळकंठ रेड्डी यांना घेराव चार कलमी पानांचे निवेदन सादर केले. 

याविषयी आपचे गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स म्हणाले, राज्यातील प्रशासन ढासळले आहे. वीज मंत्री नसल्याने खात्याला वालीच उरलेला नाही. सातत्याने वीजेचा लंपडाव सुरु आहे. तरीही वीज दरवाढ केली जाते. चतुर्थीच्या काळात लोकांना अविरत वीजपुरवठा द्यावा, अशी आपची मागणी आहे. आज दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने घरपोच चाळीस प्रशासनसेवा सुरु केल्या. मात्र, गोव्यातील सरकारचे तीनतेरा वाजलेले आहे. वीज कर्मचाºयांच्या क्वाटर्सची दुरवस्था झालेली आहे. मुख्य विद्युत अभियंता रेड्डी हे निवृत्त झाले आहेत; तरीही त्यांच्याकडे वर्षभरासाठी अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या कृतीचा आपकडून निषेध व्यक्त केला जातो, असे त्यांनी सांगितले.

प्रदीप पाडगावकर म्हणाले, सोशल माध्यमातून खंडित वीजपुरवठ्याविषयी सामन्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कुडचडे, डिचोली, आल्त-बेती यासारख्या परिसरात वीज नसल्याने लोक हैरान झाले आहेत. आज सोमवारी सकाळपासून रायबंदर परिसरात वीजपुरवठा खंडित आहे. राज्यातील वीजउपकरणे ही निकामी व जुनी बनली आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर सुद्धा मुख्य अभियंता रेड्डी यांना पदभार दिला जातो. हे चुकीचे असून ते या पदाच्या लायक नाहीत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या वेळी आपच्या कार्यकर्त्यांना सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच रेड्डी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली.

 

कोट : 

खात्याकडे वीजपुरवठा खंडितच्या तशा तक्रारी येत नाहीत. ज्या येतात, त्यावर कारवाई केली जाते. १९१२ ही खात्याची हेल्पलाईन सेवा आहे. पण त्यावर तशा तक्रारी नाहीत. वीज कर्मचाºयांसाठी असणाºया क्वाटर्सच्या दुरुस्तीसाठी सरकारने दोन कोटी निधी मंजूर केला आहे. पावसाळ्यानंतर ही कामे हाती घेतली जातील. दोन क्वाटर्सची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यासाठी या संबंधितांचे स्थलांतर करून ते क्वाटर्स पाडून तिथे नवीन बांधकाम केले जाईल. नवीन मुख्य अभियंताला घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. विभाग पातळीवर कोणताही अधिकारी नसल्याने नवीन अभियत्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे केवळ पदभार सोपवला आहे. 

- एन. निळकंठ रेड्डी, मुख्य विद्युत अभियंता 

टॅग्स :electricityवीजgoaगोवा