शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

विजेचा लंपडाव तरी सरकार झोपलेले! आपचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:44 IST

राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे.

पणजी -  राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे. सरकारने केलेली वीज दरवाढ, वीज कर्मचारी क्वाटर्सची दुरुस्ती, मुख्य विद्युत अभियंताकडून पदभार मागे घेणे तसेच अविरत वीजपुरवठा देणे यासारख्या प्रमुख मागण्या करत सोमवारी (१० सप्टेंबर) आम आदमी पक्षातर्फे पणजीत विद्युत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी वीज दरवाढ व अभियंता रेड्डी यांना निवृत्तीनंतर दिलेल्या पदभार या सूचनापत्रांची होळी केली. तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य विद्युत अभियंता एन. निळकंठ रेड्डी यांना घेराव चार कलमी पानांचे निवेदन सादर केले. 

याविषयी आपचे गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स म्हणाले, राज्यातील प्रशासन ढासळले आहे. वीज मंत्री नसल्याने खात्याला वालीच उरलेला नाही. सातत्याने वीजेचा लंपडाव सुरु आहे. तरीही वीज दरवाढ केली जाते. चतुर्थीच्या काळात लोकांना अविरत वीजपुरवठा द्यावा, अशी आपची मागणी आहे. आज दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने घरपोच चाळीस प्रशासनसेवा सुरु केल्या. मात्र, गोव्यातील सरकारचे तीनतेरा वाजलेले आहे. वीज कर्मचाºयांच्या क्वाटर्सची दुरवस्था झालेली आहे. मुख्य विद्युत अभियंता रेड्डी हे निवृत्त झाले आहेत; तरीही त्यांच्याकडे वर्षभरासाठी अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या कृतीचा आपकडून निषेध व्यक्त केला जातो, असे त्यांनी सांगितले.

प्रदीप पाडगावकर म्हणाले, सोशल माध्यमातून खंडित वीजपुरवठ्याविषयी सामन्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कुडचडे, डिचोली, आल्त-बेती यासारख्या परिसरात वीज नसल्याने लोक हैरान झाले आहेत. आज सोमवारी सकाळपासून रायबंदर परिसरात वीजपुरवठा खंडित आहे. राज्यातील वीजउपकरणे ही निकामी व जुनी बनली आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर सुद्धा मुख्य अभियंता रेड्डी यांना पदभार दिला जातो. हे चुकीचे असून ते या पदाच्या लायक नाहीत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या वेळी आपच्या कार्यकर्त्यांना सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच रेड्डी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली.

 

कोट : 

खात्याकडे वीजपुरवठा खंडितच्या तशा तक्रारी येत नाहीत. ज्या येतात, त्यावर कारवाई केली जाते. १९१२ ही खात्याची हेल्पलाईन सेवा आहे. पण त्यावर तशा तक्रारी नाहीत. वीज कर्मचाºयांसाठी असणाºया क्वाटर्सच्या दुरुस्तीसाठी सरकारने दोन कोटी निधी मंजूर केला आहे. पावसाळ्यानंतर ही कामे हाती घेतली जातील. दोन क्वाटर्सची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यासाठी या संबंधितांचे स्थलांतर करून ते क्वाटर्स पाडून तिथे नवीन बांधकाम केले जाईल. नवीन मुख्य अभियंताला घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. विभाग पातळीवर कोणताही अधिकारी नसल्याने नवीन अभियत्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे केवळ पदभार सोपवला आहे. 

- एन. निळकंठ रेड्डी, मुख्य विद्युत अभियंता 

टॅग्स :electricityवीजgoaगोवा