शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

गोव्यात झेडपीसाठी १२ रोजी निवडणूक; निवडणूक आयोगाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:27 IST

आयुक्त गर्ग यांनी निवडणूक आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. 

पणजी : राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी येत्या १२ रोजी मतदान होईल हे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी शनिवारी जाहीर केले. त्याचबरोबर ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू झाली. १४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जे मतदार मतदान केंद्रावर मास्क घालून येणार नाहीत, त्यांना मतदान करता येणार नाही असेही आयुक्तांनी जाहीर केले.

आयुक्त गर्ग यांनी निवडणूक आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. निवडणूक १२ डिसेंबरलाच होईल असे वृत्त लोकमतने दिले होते. तथापि, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी निवडणूक जानेवारीत घ्यावी अशी सूचना केली होती. सरकारने व आयोगानेही ती सूचना फेटाळली. 

आयोगाने शनिवारी सायंकाळी पाच वाजता निवडणूक जाहीर केल्याने त्यावेळपासूनच राज्यातीलजिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू झाली. पालिका क्षेत्रांमध्ये ही आचारसंहिता लागू होत नाही. यापुढे जाहीरपणे प्रचार करता येणार नाही. सभा किंवा कोपरा बैठका घेता येणार नाहीत, असे गर्ग यांनी सांगितले. राज्यात एकूण ५० जिल्हा पंचायत मतदारसंघ असले तरी, सांकवाळ मतदारसंघात अगोदरच उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे तर नावेलीत रिंगणातील एका उमेदवाराचे निधन झाल्याने तेथील  निवडणूक रद्द झाली आहे. तिथे मग पोटनिवडणूक होईल पण तूर्त राज्यातील ४८ झेडपी मतदारसंघांत निवडणूक होईल. उमेदवार वगैरे पूर्वीचेच असतील. लॉकडाऊन आल्यामुळे व कोविड संकटामुळे मतदान घेता आले नव्हते. आता सगळी खबरदारी घेऊन व आरोग्य खात्याच्या एसओपीचे पालन करून मतदान घेतले जाईल, असे गर्ग यांनी सांगितले. 

मतपत्रिकांचा वापर केला जाईल. प्रत्येक मतदाराने तोंडाला मास्क बांधूनच मतदान करण्यासाठी यावे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर क्षणभर मास्क काढण्यास परवानगी असेल. मात्र मास्क घातले नाही तर मतदान करू दिले जाणार नाही. घरातून बाहेर पडताना जर कुणी मास्क घातले नाही तर दोनशे रुपयांचा दंड पोलिस देतीलच पण मतदानही करता येणार नाही, असे गर्ग म्हणाले.

कोविडग्रस्तही मतदान करतील-

दरम्यान, जे कोविडग्रस्त आहेत, त्यांना देखील मतदान करता येईल. सकाळी आठ वाजता सर्व मतदान केंद्रांवरून प्रक्रिया सुरू होईल. मात्र जे कोविडबाधित होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना सायंकाळी मतदान संपण्याच्यावेळी म्हणजे शेवटच्या टप्प्यात मतदान करू दिले जाईल. ते मतदान केंद्रावर येऊ शकतील, असे गर्ग यांनी सांगितले. सध्याची  निवडणूक आचारसंहिता ही दि. १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असेल. मतमोजणी विविध ठिकाणी होणार आहे.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक