शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

'म्हादई'तील आग रोखण्याचे प्रयत्न; जैवसंपदेचे प्रचंड नुकसान, वन खात्याचे युद्धपातळीवर मदतकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 13:14 IST

म्हादई क्षेत्रात साट्रे गड या ठिकाणी लागलेली आग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : म्हादई क्षेत्रात साट्रे गड या ठिकाणी लागलेली आग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. परंतु, गावातून पारवडकडे जाणाऱ्या मार्गावर सुर्ला नदी परिसरातील जंगलातील आगीचा भडका सुरूच आहे. तसेच देरोडे गावातील अभयारण्यात आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बुधवारी दिवसभर वन खात्याचे कर्मचारी गटागटाने जाऊन आग आटोक्यात आणण्याच्या कामात व्यस्त होते. दरोडे येथील आग आटोक्यात आणण्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना रसद पुरविण्याचे काम कोदाळ येथील अभयारण्याच्या कार्यालयामधून होत आहे. कर्मचाऱ्यांना अन्न, पाणी पुरविले जाते. वन खात्याचे कर्मचारी आगीशी झुंज देत आहेत. पण, ते पुरेसे ठरलेले नाही. आग रोखण्याच्या कामात बरेच अडथळे येत आहेत. आग दुसरीकडे पसरू नये यासाठी बचावात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

तर कोदाळ परिसराला धोका

साट्रे गावातून सुर्ला नदीच्या पलीकडे ज्या ठिकाणी गेल्या वर्षी कडा कोसळला होता, त्या ठिकाणी असलेल्या अभयारण्यात आगीचे लोट दिसत आहेत. आगीचे लोट जर कोदाळ गावच्या दिशेने आले तर वन खात्याच्या रबर लागवडीपर्यंतसुद्धा ती आग येऊ शकते. त्यामुळे आता डोंगरावर लागलेली आग खाली येऊन आणखी पसरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वी पेट्रोल ऑपरेटेड एअर ब्लोअर वापरून पालापाचोळा दूर करण्याचे तंत्र वापरले जात होते. आताही तसेच करण्याची, आग दुसरीकडे पसरणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दाट अरण्यात पोहोचून आग रोखणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे आग अजून दुसरीकडे पसरू नये यासाठी काळजी घेणे किंवा त्यासाठीची उपाययोजना हेच वन खात्याच्या पर्यायाने सरकारच्या हातात आहे. सरकारने त्वरित उपाययोजना करावी आणि आग पसरू नये याची काळजी घ्यावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा