शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:21 IST

गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत ४0 पैकी ३५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाला निवडून द्या

पणजी : गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत ४0 पैकी ३५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाला निवडून द्या, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले. दोनापावल येथे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शहा यांनी गोव्यातील भाजपा बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही जागा भाजपालाच मिळायला हव्यात यासाठी तयारीला लागा, असे आवाहन शहा यांनी केले. गोव्याचा खाणबंदीचा प्रश्न कोर्टाच्या माध्यमातूनच सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रात संरक्षणमंत्री असताना केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.भाजपा कर्नाटकात पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, भाजपाचे संघटन विशिष्ट अशा विचारधारेला समर्पित आहे. भाजपाकडे आज ११ कोटी सदस्य आहेत. देशभरातून लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि कर्नाटकातही निवडणूक निकालातून त्याचा प्रत्यय येईल. देशभरात सर्वाधिक १८00 आमदार भाजपाकडेच आहेत. ३३0 खासदार असलेला हा सर्वात मोठा पक्ष आहे.काँग्रेसने एवढी वर्षे सत्ता उपभोगली; पण तब्बल १९ हजार गावांमध्ये ते वीज देऊ शकले नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आज एकही गाव विजेविना नाही. काँग्रेसच्या कारकिर्दीत हे का घडले नाही याचे उत्तर राहुल गांधी देऊ शकतील काय? ५0 कोटी जनतेचे बँकेत खातेच नव्हते. ३१ कोटी लोकांना भाजपाने खाती उघडून दिली. ५0 लाख लोकांना वीज दिली. ६0 कोटी लोकांना शौचालये दिली. आता ५ लाख रुपयांचा आरोग्य विमाही भाजपा सरकारने जाहीर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.