शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

खाण बंदीच्या राजकीय परिणामांची धास्ती, सरदेसाई यांची सुरेश प्रभूंशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 18:16 IST

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत.

पणजी : राज्यातील खनिज खाण बंदीचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याची पूर्ण कल्पना सत्ताधारी भाजपला आता येऊ लागली आहे. त्याचबरोबर भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डलाही कल्पना आली आहे. फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची शनिवारी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. खाणी तातडीने सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक घडवून आणावी, अशी विनंती सरदेसाई यांनी केली.

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली व विविध विषयांबाबत चर्चा केली. विकास कामांविषयी चर्चा होतानाच, खनिज खाणींच्या विषयावरही पर्रिकरांसोबत त्यांची चर्चा झाल्याचे सुत्रंनी सांगितले. पर्रिकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून खनिज खाणप्रश्नी चर्चेसाठी वेळ मागितली असल्याचे कळते. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

मंत्री सरदेसाई यांनी सुरेश प्रभूंची भेट घेतली तेव्हा कृषी, पर्यटन व मच्छीमार क्षेत्रत उपजिविकाविषयक कोणत्या योजना केंद्र सरकार राबविते याविषयी चर्चा झाली. खनिज खाणी बंद झालेल्या आहेत व गोव्यातील अनेक कुटूंबांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे लक्षात घ्यावे लागेल असे मंत्री सरदेसाई यांनी सुरेश प्रभू यांना सांगितले. प्रभू सकारात्मक आहेत. त्यांना खनिज खाण बंदीच्या राजकीय व आर्थिक परिणामांची कल्पना असून त्यांनी पंतप्रधानांसोबत येत्या आठवडय़ात बैठकीच्या आयोजनाची व्यवस्था करतो अशी ग्वाही दिली असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी बैठकीनंतर जाहीर केले.

आजारी सरकार निरुपयोगी : रेजिनाल्ड 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गोव्यातील विद्यमान आजारी सरकार निरुपयोगी ठरले आहे, अशी टीका शनिवारी केली. गोव्यातील लोकांना भेडसावणारे अनेक प्रश्न व समस्या आहेत पण त्यावर विधानसभेत चर्चा देखील करण्याची र्पीकर सरकारची तयारी नाही. त्यामुळेच केवळ तीन दिवसांचे विधानसभा अधिवेशन येत्या जानेवारीत बोलावून सरकार लोकांची थट्टा करत आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले. वर्षाला 50 दिवस अधिवेशन असायलाच हवे असे पर्रिकर विरोधात असताना कायम म्हणत होते. आम्हाला विधानसभेत विविध विषयांबाबत चर्चा करून लोकांच्या समस्यांवर तोडगा काढायचा आहे. मात्र विरोधकांनाही विश्वासात न घेता सरकारने केवळ तीनच दिवसांचे अधिवेशन बोलवावे असे ठरविले आहे. सरकार स्वत:च्या आजाराचे व स्वत:च्या रोगाचे इंजेक्शन गोव्याच्या लोकशाही व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेच्या प्रशासनाला मारू पाहत आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा