शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

खाण बंदीच्या राजकीय परिणामांची धास्ती, सरदेसाई यांची सुरेश प्रभूंशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 18:16 IST

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत.

पणजी : राज्यातील खनिज खाण बंदीचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याची पूर्ण कल्पना सत्ताधारी भाजपला आता येऊ लागली आहे. त्याचबरोबर भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डलाही कल्पना आली आहे. फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची शनिवारी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. खाणी तातडीने सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक घडवून आणावी, अशी विनंती सरदेसाई यांनी केली.

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली व विविध विषयांबाबत चर्चा केली. विकास कामांविषयी चर्चा होतानाच, खनिज खाणींच्या विषयावरही पर्रिकरांसोबत त्यांची चर्चा झाल्याचे सुत्रंनी सांगितले. पर्रिकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून खनिज खाणप्रश्नी चर्चेसाठी वेळ मागितली असल्याचे कळते. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

मंत्री सरदेसाई यांनी सुरेश प्रभूंची भेट घेतली तेव्हा कृषी, पर्यटन व मच्छीमार क्षेत्रत उपजिविकाविषयक कोणत्या योजना केंद्र सरकार राबविते याविषयी चर्चा झाली. खनिज खाणी बंद झालेल्या आहेत व गोव्यातील अनेक कुटूंबांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे लक्षात घ्यावे लागेल असे मंत्री सरदेसाई यांनी सुरेश प्रभू यांना सांगितले. प्रभू सकारात्मक आहेत. त्यांना खनिज खाण बंदीच्या राजकीय व आर्थिक परिणामांची कल्पना असून त्यांनी पंतप्रधानांसोबत येत्या आठवडय़ात बैठकीच्या आयोजनाची व्यवस्था करतो अशी ग्वाही दिली असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी बैठकीनंतर जाहीर केले.

आजारी सरकार निरुपयोगी : रेजिनाल्ड 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गोव्यातील विद्यमान आजारी सरकार निरुपयोगी ठरले आहे, अशी टीका शनिवारी केली. गोव्यातील लोकांना भेडसावणारे अनेक प्रश्न व समस्या आहेत पण त्यावर विधानसभेत चर्चा देखील करण्याची र्पीकर सरकारची तयारी नाही. त्यामुळेच केवळ तीन दिवसांचे विधानसभा अधिवेशन येत्या जानेवारीत बोलावून सरकार लोकांची थट्टा करत आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले. वर्षाला 50 दिवस अधिवेशन असायलाच हवे असे पर्रिकर विरोधात असताना कायम म्हणत होते. आम्हाला विधानसभेत विविध विषयांबाबत चर्चा करून लोकांच्या समस्यांवर तोडगा काढायचा आहे. मात्र विरोधकांनाही विश्वासात न घेता सरकारने केवळ तीनच दिवसांचे अधिवेशन बोलवावे असे ठरविले आहे. सरकार स्वत:च्या आजाराचे व स्वत:च्या रोगाचे इंजेक्शन गोव्याच्या लोकशाही व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेच्या प्रशासनाला मारू पाहत आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा