शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटन व्यवसायासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 15:08 IST

गोवा एरव्ही शांत व सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र वेगवेगळ्य़ा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2017 साली वाढले.

पणजी - गोवा एरव्ही शांत व सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र वेगवेगळ्य़ा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2017 साली वाढले. खुनाचे व अपहरणांचे प्रमाण घटले आहे पण बलात्कार, घरफोडया व चो-यांचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातील वाढती गुन्हेगारी ही पर्यटन व्यवसायासमोर हळूहळू आव्हान उभी करू लागली आहे व त्यामुळे पर्यटनव्यवसायाशीनिगडीत विविध घटक चिंताग्रस्त बनताना दिसून येत आहे. गोव्यात गुन्हे वाढत असल्याचे पर्यटकांना दिसून आले तर गोवा हे असुरक्षित पर्यटन स्थळ बनण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.वर्ष संपायला आले, की पोलिस खाते वर्षभरातील सगळ्य़ा गुन्ह्यांबाबच्या आकडेवारीचे विश्लेषण करत असते. यावेळीही गोव्यातील सर्व पोलिस स्थानकांमधील आकडेवारीचे खात्याने विश्लेषण केले आहे. सरकारला ही आकडेवारी सादर झाली आहे. विविध गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण 2क्16 च्या तुलनेत 2क्17 साली वाढले आहे. पण वाढीचे हे प्रमाण केवळ 1 टक्का आहे. अलिकडेच क्रॉस मोडतोड प्रकरणांच्या मालिकेतील संशयीत बहुतांश खटल्यातून दोषमुक्त झाला व पोलिस खात्याच्या क्षमतेबाबत लोकांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीनांचे विनयभंग, लैंगिक छळ होण्याच्या घटना राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातही घडत आहेत. स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अशा प्रकरणी आरोपी म्हणून जास्त आहे. गोव्यात बांधकाम व्यवसाय आणि पर्यटन व्यवसाय वाढत आहे. या दोन्ही व्यवसायांमधून काही अपप्रवृत्ती पुढे येत आहेत. परप्रांतांमधून प्रचंड मजुरांची फौज गोव्यात आली व या दोन्ही व्यवसाय क्षेत्रंमध्ये ती जास्त स्थिरावली आहे. औद्योगिक वसाहती, बार्ज व्यवसाय, ट्रॉलरद्वारे मासेमारीचा धंदा आणि खनिज व्यवसायातही अनेक परप्रांतीय मजुर दिसून येतात. 9क् टक्के ट्रक ड्रायव्हर हे झारखंड, बिहार व अन्य परराज्यांतील आहेत. गोव्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय मजुर व कामगारांचे प्रमाण हे खूप आहे. स्थानिक युवकांचे प्रमाणही गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे. सांगेत नुकताच तरुणाचा जो खून झाला, त्यात सगळे स्थानिकच आहेत. गोव्यात 2क्17 साली अपहरणांचे 86 गुन्हे घडले. त्यापैकी 52 अपरहणांचा छडा लागला. उर्वरित अपहरण प्रकरणांचा गुंता अजून कायम आहे. बारा महिन्यांत बलात्काराची 7क् प्रकरणो पोलिसांत नोंद झाली. त्यापैकी 69 प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. एकूण 174 घरफोडय़ांचे गुन्हे नोंद झाले. त्यापैकी फक्त 6क् प्रकरणांचा तपास यशस्वी झाला. खून करण्याचा प्रयत्न करण्याचे 24 गुन्हे नोंद झाले व त्या सर्व प्रकरणांचा छडा लागला. एकूण 3क् खुनांची नोंद मावळत्या वर्षाने केली. त्यापैकी 24 खुनांचा तपास लागल्याचे पोलिस खात्याची आकडेवारी दाखवून देत आहे.गोव्यातील वाढती गुन्हेगारी ही पर्यटन व्यवसायासाठी धोक्याची घंटा आहे. कळंगुटचे आमदार तथा हॉटेल व्यवसायिक मायकल लोबो यांनी यापूर्वी पोलिस बंदोबस्त महत्त्वाच्या ठिकाणी वाढवावा, पोलिसांना नवी वाहने द्यावीत व पोलिसांचे इंटेलिजन्स वाढावे, अशा मागण्या जाहीरपणो केल्या आहेत. विधानसभेतही लोबो यांनी भूमिका मांडून पर्यटन क्षेत्रतील वाढती अस्वस्थताच एक प्रकारे उघड केली आहे. अंमली पदार्थ व्यवहारांशीनिगडीत सर्वाधिक प्रकरणो 2क्17 साली नोंद झाली. पोलिसांना याचे श्रेय जाते पण मोठे ड्रग्ज वितरक व पुरवठादार पडद्याआडच राहिले असून छोटे विक्रेते सापडत आहेत. काही आमदारांनीही यापूर्वी अशी टीका केली आहे. 

टॅग्स :goaगोवा