शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

धावपट्टीवर कुत्रा आल्याने विमानाचं उड्डाण थांबवलं, दाबोळी विमानतळावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 12:29 IST

गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं.

ठळक मुद्दे गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं. मुंबईकडे जायला निघालेल्या इंडिगोच्या 6 इ 458 विमानासमोर संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास हा प्रकार घडला.

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं. मुंबईकडे जायला निघालेल्या इंडिगोच्या 6 इ 458 विमानासमोर संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास हा प्रकार घडला. वैमानिकाला विमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. 

वैमानिकाने विमान थांबवलं पण खबरदारी म्हणून नंतर ते विमान पार्किंग तळावर आणून काही टायर बदलावे लागले. विमानतळ सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला. विमानात सुमारे १00 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याने सर्वजण बचावले. या घटनेमुळे अडीच तास विलंबाने विमानाने उड्डाण केलं 

वैमानिकाने ग्राउंड स्टाफ, अभियंते तसेच प्रवाशांना या गोष्टीची कल्पना दिली. बुधवारी संध्याकाळी  ५.३0 च्या सुमारास विमान उ्डडाण करायला सज्ज असताना धावपट्टीवर अचानक कुत्रा आडवा आल्याने वैमानिकाला अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे विमान हेलकावे खात उजवीकडे आणि डाविकडे धावू लागले. परंतु अखेर वैमानिकाने त्यावर नियंत्रण आणले. टायर बदलण्याच्या किरकोळ दुरुस्तीनंतर अभियंत्यांनी विमानाची पुन्हा एकदा तपासणी केली आणि नंतरच ते मुंबईकडे रवाना केलं. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी या विमानाने मुंबईकडे झेप घेतली आणि ९.३८ वाजता ते मुंबईला उतरले. 

दाबोळी विमानतळाच्या परिसरात भटकी कुत्री, गाई, म्हशी आदी जनावरांचा वावर वाढलेला आहे. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने घारी, तसेच अन्य पक्षीही आकाशात घिरट्या घालत असतात. अनेकदा हे पक्षीही वैमानिकांना विमान उड्डाणाच्या वेळी तसंच लँडिंगच्यावेळी त्रासदायक ठरतात. भटकी जनावरे विमानतळाच्या अवारात किंवा धावपट्टीवर येऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचा दावा विमानतळ प्रधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून केला जातो परंतु अशा घटना नेहमीच्याच बनल्या आहेत. 

दरम्यान, दाबोळी मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विरोधात असताना विमानतळ परिसरातील कचरा तसेच भटक्या जनावरांच्या प्रश्नावर वेळोवेळी विधानसबेत आवाज उठविला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केवळ दाबोळी पंचायतीलाच नव्हे तर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मॉविन म्हणाले की, दाबोळी, सांकवाळ, चिखली, चिकोळणा, बोगमाळो, वास्को आदी भागातील लोकसंख्या ३0 हजार होती ती आज १ लाखापेक्षा अधिक झालेली आहे.  

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ