शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:44 IST

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वाचवण्याची तळमळ असणाऱ्या तसेच गोव्यावर प्रेम असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी या पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना प्रामाणिकपणे गोवा वाचवण्याची इच्छा आहे, त्यांनी आरजीत यावे. आरजी लवकरच त्यादृष्टीने सदस्य मोहीमही सुरू करेल, असे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, की दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली होती. मात्र, दिल्लीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोव्यात सुद्धा या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतात, पण आरजीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. यावरून हे पक्ष केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. गोव्यातील राजकीय पक्ष कमी पडत असल्यानेच कदाचित दिल्लीच्या राजकीय पक्षांना संधी मिळत आहे. मात्र, आरजी पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने गोवा वाचवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना...

आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस आरजीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. उलट या दोन्ही पक्षांनी दिल्ली निवडणुकीत इंडिया अलायन्स या संकल्पनेचीच थट्टा केली आहे. कारण, त्यांनी जर ही संकल्पना पाळली असती तर एकत्रपणे निवडणूक लढवली असती. निवडणूक निकाल वेगळा लागला असता. निवडणूक लढवण्यावरूनही ते आमच्यावर आरोप करतात. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनोज परब यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण