शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:44 IST

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वाचवण्याची तळमळ असणाऱ्या तसेच गोव्यावर प्रेम असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी या पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना प्रामाणिकपणे गोवा वाचवण्याची इच्छा आहे, त्यांनी आरजीत यावे. आरजी लवकरच त्यादृष्टीने सदस्य मोहीमही सुरू करेल, असे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, की दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली होती. मात्र, दिल्लीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोव्यात सुद्धा या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतात, पण आरजीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. यावरून हे पक्ष केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. गोव्यातील राजकीय पक्ष कमी पडत असल्यानेच कदाचित दिल्लीच्या राजकीय पक्षांना संधी मिळत आहे. मात्र, आरजी पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने गोवा वाचवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना...

आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस आरजीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. उलट या दोन्ही पक्षांनी दिल्ली निवडणुकीत इंडिया अलायन्स या संकल्पनेचीच थट्टा केली आहे. कारण, त्यांनी जर ही संकल्पना पाळली असती तर एकत्रपणे निवडणूक लढवली असती. निवडणूक निकाल वेगळा लागला असता. निवडणूक लढवण्यावरूनही ते आमच्यावर आरोप करतात. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनोज परब यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण