शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:44 IST

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वाचवण्याची तळमळ असणाऱ्या तसेच गोव्यावर प्रेम असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी या पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना प्रामाणिकपणे गोवा वाचवण्याची इच्छा आहे, त्यांनी आरजीत यावे. आरजी लवकरच त्यादृष्टीने सदस्य मोहीमही सुरू करेल, असे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, की दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली होती. मात्र, दिल्लीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोव्यात सुद्धा या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतात, पण आरजीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. यावरून हे पक्ष केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. गोव्यातील राजकीय पक्ष कमी पडत असल्यानेच कदाचित दिल्लीच्या राजकीय पक्षांना संधी मिळत आहे. मात्र, आरजी पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने गोवा वाचवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना...

आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस आरजीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. उलट या दोन्ही पक्षांनी दिल्ली निवडणुकीत इंडिया अलायन्स या संकल्पनेचीच थट्टा केली आहे. कारण, त्यांनी जर ही संकल्पना पाळली असती तर एकत्रपणे निवडणूक लढवली असती. निवडणूक निकाल वेगळा लागला असता. निवडणूक लढवण्यावरूनही ते आमच्यावर आरोप करतात. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनोज परब यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण