शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:44 IST

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वाचवण्याची तळमळ असणाऱ्या तसेच गोव्यावर प्रेम असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी या पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना प्रामाणिकपणे गोवा वाचवण्याची इच्छा आहे, त्यांनी आरजीत यावे. आरजी लवकरच त्यादृष्टीने सदस्य मोहीमही सुरू करेल, असे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, की दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली होती. मात्र, दिल्लीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोव्यात सुद्धा या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतात, पण आरजीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. यावरून हे पक्ष केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. गोव्यातील राजकीय पक्ष कमी पडत असल्यानेच कदाचित दिल्लीच्या राजकीय पक्षांना संधी मिळत आहे. मात्र, आरजी पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने गोवा वाचवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना...

आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस आरजीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. उलट या दोन्ही पक्षांनी दिल्ली निवडणुकीत इंडिया अलायन्स या संकल्पनेचीच थट्टा केली आहे. कारण, त्यांनी जर ही संकल्पना पाळली असती तर एकत्रपणे निवडणूक लढवली असती. निवडणूक निकाल वेगळा लागला असता. निवडणूक लढवण्यावरूनही ते आमच्यावर आरोप करतात. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनोज परब यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण