शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
2
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
3
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
4
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
5
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
7
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
8
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
9
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
10
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
11
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
12
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
13
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
14
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
15
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
16
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
17
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
18
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
19
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
20
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

"फक्त गुणांमागे धावू नका, अधिक चौकस व्हा", सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 05:57 IST

Bhushan Gavai News: आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त जास्त गुण मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांऐवजी चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

पणजी - आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त जास्त गुण मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांऐवजी चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात असून, त्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.ते पणजी येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कनिष्ठ वकिलांना मार्गदर्शनपाच वर्षांचा अभ्यासक्रम : कायद्याचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.अनुभवी वकिलांना सल्ला : तरुण वकिलांचे कायद्याचे ज्ञान पाहून सरन्यायाधीशांनी कौतुक केले आणि अनुभवी वकिलांनीही त्यांच्याकडून शिकावे, असे ते म्हणाले.कनिष्ठ वकिलांचे प्रश्न : सरन्यायाधीश गवई यांनी कमी वेतन आणि इतर समस्यांवरही चर्चा केली.

महाविद्यालयाचे कौतुकसरन्यायाधीश भूषण गवई यांनी सामाजिक बांधीलकी जपणारे उद्योजक व्ही. एम. साळगावकर यांनी गोव्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाचे कौतुक केले. या संस्थेने गोव्याच्या न्यायव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे ते  म्हणाले. 

सरन्यायाधीशांनी जागवल्या आठवणीसरन्यायाधीश गवई यांनी  महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. ‘मी अनेकदा वर्ग चुकवायचो; पण माझे मित्र माझी वर्गात उपस्थिती लावायचे. मात्र, मी जेव्हा अभ्यास करायचो, तेव्हा पूर्ण एकाग्रतेने करायचो. यामुळे  या स्थानापर्यंत पोहोचलो,’ असे ते म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयgoaगोवा