शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हल्ला कट करून; गुन्हे मागे घेऊ नका! संतप्त शिवप्रेमींची सरकारकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2024 13:55 IST

वाद शिवरायांच्या पुतळ्याचा 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सां जुझे आरियल येथे उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा अधिकृत आहे. मात्र, शिवजयंतीदिनी घडलेला प्रकार निंदनीय असून २० हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता हे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात असून सरकारने ते मागे घेऊ नयेत, अशी मागणी शिवप्रेमी आनंद तांडेल यांनी केले.

काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत पुतळा ज्यांच्या जमिनीत कायदेशीरपणे उभारण्यात आला आहे ते जमीन मालक मेहबूब मकानदार, दीपक कट्टमणी व इतर शिवप्रेमी उपस्थित होते. मंत्री फळदेसाईवर जो हल्ला झाला तो पूर्वनियोजित होता. कारण ज्यावेळी माती व दगड त्यांच्यावर फेकण्यात आले त्यावेळी जो व्हिडियो व्हायरल झाला त्यात फ्रेडी त्रावासो हे हात उंचावून जमावाला सिग्नल देत असल्याचे दिसून येते. आमदार क्रूझ सिल्वा व फ्रेडी त्रावासो या दोघांनी मिळून स्थानिकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवप्रेमींनी केला.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे फ्रेडी त्रावासो हे कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आमदार सरदेसाई व आमदार क्रूझ सिल्वा यांनी मिलीभगत करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तांडेल यांनी केला.

राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी लोकांचा वापर केला, असाही दावा त्यांनी केला. डोंगरावर किल्ल्याची प्रतिकृती बांधायची होती. त्यासाठी २७ डिसेंबर २०२३ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता, त्याठिकाणी असलेली दोन आंब्याची झाडे कापायची होती. जर ती झाडे कापली असती तर रस्त्यावरून शिवाजी महाराजांचा पुतळा लोकांना दिसला असता, असे तांडेल यांनी सांगितले. अजूनही काही जणांवर गुन्हे नोंद करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना नावे नोंद करण्यास सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिल्वांचे समाधान नाही: जमीन मालक

जमीन मालक मेहबूब मकानदार म्हणाले, आपण आमदार कूझ सिल्वा यांना सर्व ती आवश्यक कागदपत्रे दाखवली. मात्र, एवढे करूनही त्यांचे समाधान झाले नाही. आपल्या जमिनीत स्थानिकांनी खुरीस बांधला असून त्यावर पक्के छत घातले आहे. त्यासाठी आपल्याकडून परवानगी घेतली नाही तरीही आपण गप्प राहिलो मात्र, आपल्या जमिनीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर या लोकांनी का विरोध केला?

मुख्यमंत्र्यांना साकडे

सां जुझे आरियलच्या प्रश्नावर वेळळीचे आमदार कुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेले २० जणांविरुध्दचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. १८ व १९ रोजी सां जुझे आरियल येथे काय घडले याची कल्पना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. भविष्यातही तेथे तणाव निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः अहवाल मागवून घेतलेला आहे. ग्रामस्थांना शांतता हवी आहे.

 

टॅग्स :goaगोवाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPramod Sawantप्रमोद सावंत