शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

खाकीला डाग लागू देऊ नका; मुख्यमंत्री सावंत यांचा पोलिसांना सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2024 08:12 IST

वाळपईत ४९ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : 'लोक सेवा हीच खरी पोलिसांची सेवा' असायला हवी. त्यासाठी कोणत्याही संकटांना तोंड देण्याची क्षमता पोलिसांमध्ये असणे आवश्यक आहे. पोलिसांनी चांगले काम करावे. त्यांनी कधीच आपल्या खाकी वर्दीला डाग लावू देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.

गोवा पोलिस खात्याच्या सर्व श्रेणी विभागाच्या ४९ व्या तुकडीच्या पोलिस कॉन्स्टेबल यांचा दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर रविवारी सकाळी हा दिक्षांत सोहळा पार पडला. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पोलिस अधीक्षक सुचिता देसाई यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांचे शिक्षण कमी आहे त्यांनी देखील पुढे शिक्षण घेतल्यास बढतीची संधी मिळेल. पोलिसांनी वर्दीचा नेहमीच मान, सन्मान ठेवला पाहिजे. सेवा काळात कोणाताही काळा डाग लागणार नाही याची नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे. बदनामी होणार नाही याची काळजी घेऊन पोलिस विभागाची शान राखली पाहिजे, न डगमगता काम करावे व छाती पुढे करुन ताठ मानेने कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी देश, राज्य सेवेसाठी कटीबध्द राहून लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे असे सावंत म्हणाले. पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

आज पोलिस विभागात ४७३ पोलिस भरती झालेले आहेत. यामध्ये दहावीपासून उच्च शिक्षितांचा समावेश आहे. अशांना येणाऱ्या काळात सेवेत पुढील पद मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी स्वतःला सिध्द करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

यांचा सन्मान...

यावेळी संजय वरक, ऐश्वर्या नाईक, रुषिकेश शेट, सौरभ नाईक, आत्माराम पोळे, केदार च्यारी यांना इन डोअर, आऊट डोअर विभागातून तर बेस्ट ऑल राऊंडर म्हणून संजय वरक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सुव्रनिवेदन अमिता नाईक यांनी केले. प्रशिक्षणार्थीना शपथ प्राचार्य सुचिता देसाई यांनी दिली.

राज्यात पर्यटकांना सुरक्षितता द्या...

गोव्याचा पर्यटन उद्योग बहरत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत. या पर्यटकांना सुरक्षित गोव्याची सफर घडविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस सेवेत काम करत असताना पर्यटकांना सहकार्य करा, तेव्हाच गोव्याची प्रतिमा आणखी मोठी होईल. पोलिस दलात काम करताना गोमंतकीयांची मान उंचावेल याच दृष्टीने प्रयल करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण