शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

विकासासाठी पश्चिमेकडे डोळे नकोत: सहस्त्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 20:48 IST

विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम कार्यक्रमात बोलताना सांगितले.

पणजी: विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम कार्यक्रमात बोलताना सांगितले.सह्त्रबुद्धे यांनी सांगितले की अवघ्या काही वर्षांचा काळ हा गुलामीत गेला याचा अर्थ हजारो वर्षांचा इतिहास असलेला आपला देश हा सदाकाळ गुलाम नव्हता. आपला देश हा खूप विकसित होता. अपल्या देशामधील नालंदा सारख्या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी विदेशातून लोकांचा या देशात ओघ सुरू होता. अक्रमकांनी नंतर नालंदा विद्यापीठ नष्ट केले आणि तेथील समृद्ध वाचनालयही जाळून टाकले हा इतिहास जेव्हा आपल्याला ठाऊक आहे तेव्हा विकासासाठी पश्चिमेला डोळे लावून राहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हिंदुत्वाची आणि पर्यायाने भारतियत्वाची जाणीव ठेवली तरी पुरे असे त्यांनी सांगितले.संपूर्ण जगात भारत हा असा देश आहे की ज्या देशाने कधीच कुणावर आक्रमण नाही केले. मानवतावादाची मूल्ल्ये भारताने जपली आहेत. वसुधैव कुटुंबकम हा संदेशभारताने जगाला दिला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक संशोधने भारतात झालेली आहेत. त्यामुळे आपण इत राष्ट्रांपेक्षा कमी प्रगत असल्याचा न्यूनगंड कधीही ठेवता कामा नये असे त्यांनी सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या शब्दात विकासाची संकल्पना सांगायचे झाल्यास आपल्याला नालंदाचे गतवैभव प्राप्त करावयाचे आहे असे ते म्हणाले.हेडगेवार विद्यालयाच्या मळा - पणजी येथील विद्यालयासमोरच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विभाग कार्यवाह नाना बेहरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल सावंत उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक आणि नागरिकही उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे कार्यक्रमाला पूर्ण गणवेशात उपस्थित होते.