शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 8, 2024 16:50 IST

१५० कोटींहून अधिकची थकीत बिले वसूल करा: वीज दरवाढीला जनसुनावणीत लोकांकडून विरोध.

पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका, त्यापेक्षा वीज खात्याने अगोदर १५० ते १६० कोटींची थकीत वीज बिले वसूल करावी म्हणजे वीज दरवाढ करावी लागणार नाही असा सल्ला देत राज्यातील प्रस्तावित ३.४८ टक्के वीज दरवाढीला संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) पणजी घेतलेल्या जनसुनावणीत लोकांनी तीव्र विरोध केला.

प्रस्तावित वीज दरवाढीवर उत्तर गोव्यासाठी जेईआरसी ने पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात जनसुनावणी घेतली. यावेळी वीज खात्याचे प्रधान मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी ० ते २०० युनिट पर्यंतच्या वीज ग्राहकांना ६ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा तर एकूण ३.४८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव मांडला. मात्र यावेळी या प्रस्तावाला अनेकांनी तीव्र विरोध केला.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की महागाईचा स्तर पाहता वीज खात्याची प्रस्तावित वीज दरवाढ ही जास्त आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. एका बाजूने सरकारन वीज दरवाढ करु पहात आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर पथदीप पेटत नाही. यामुळे वाहन चालकांचे रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. पणजीत पथदीप बंद असल्याने अंदाज न आल्याने मळा भागात एक युवक अपघातात ठार झाला. यामुळे वीज खाते काय करते ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाelectricityवीज