शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

गोमंतकीयांना गृहीत धरू नये

By admin | Updated: April 12, 2017 02:35 IST

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना घेऊन आंदोलन करण्याची बंजारा समाजाने जी धमकी दिली आहे ती खपवून घेणार नाही. जे लमाणी बेकायदा गोव्यात व्यवसाय चालवतात तो बंद करण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा १० लाख गोवेकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रेव्होल्युशनरी गोवन्स संस्थेतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. या वेळी या संस्थेचे सदस्य नाट्यकलाकार राजदीप नाईक, आरजे पंकज कुडतरकर, मनोज परब, निगम नाईक, सूरज नाईक, राज गोवेकर, माधवी परब आदी सदस्य उपस्थित होते. या संस्थेचा कोणा एका विशिष्ट समाजावर आरोप नाही; पण जे बेकायदारीत्या गोव्यात व्यवसाय करतात, पर्यटकांना त्रास देतात त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी राहिली असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली असून फक्त सोशल मीडियावर न राहता प्रत्यक्ष आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्याचे ते म्हणाले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या विधानाचे आपण समर्थन करत नसून त्यांनी आधी बिगर गोमंतकीयांची वोट बँक तयार केली आहे त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोव्यात येऊन हुकूमशाहीची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. गोव्यात स्थायिक झाल्यानंतर गोमंतकीयांची आडनावे लावून नावात बदल करण्याबाबत देखील नियंत्रण आले पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले. गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ उभी राहिली असल्याचे मनोज परब म्हणाले. आपल्या गोव्यात नीज गोंयकार लोकच दुर्मिळ होऊन बसले आहेत. बिगर गोमंतकीय येथे येतात व बेकायदा व्यवसाय चालवतात. रस्त्याच्या बाजूला नर्सरी उभारून, सिमेंट ब्लॉक्स घालून व्यवसाय करतात तसेच समुद्रकिनारी मसाज, टॅटूचे बेकायदा व्यवसाय चालवतात. उलट हेच लोक गोमंतकीयांकडे दादागिरी करतात. ते आता खपवून घेणार नाही. गोंयकारपणाचा नारा घेऊन जे सरकार स्थापन झाले आहे त्यांची देखील जबाबदारी असून गोंयकारपण टिकविण्यासाठी या विषयांकडे आधी लक्ष देणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले. या विषयावर गोवाभरातील तरुणांमध्ये जागृती केली जाईल व पुढचे पाऊल ठरविले जाणार, असे कुडतरकर यांनी सांगितले. नकारात्मक व समाजविरोधी घटक डोके वर काढत असून गोमंतकीयांनी सुशेगादपणा सोडून जागृत होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. वोट बँकेच्या नावाने बिगर गोमंतकीयांचे पालनपोषण करणे राजकीय पक्षांनी थांबवावे, असेही ते म्हणाले. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रशियनांनी विविध व्यवसाय उभारले असून तेथे भारतीयांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. हे कृत्य निषेधार्ह असून या विषयावर देखील आवाज उठवणार, असे राज गोवेकर म्हणाले. गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण आले पाहिजे. यामुळे गोव्यातील महिला देखील सुरक्षित नसल्याचे माधवी परब म्हणाल्या. (प्रतिनिधी)