शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गोमंतकीयांना गृहीत धरू नये

By admin | Updated: April 12, 2017 02:35 IST

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना घेऊन आंदोलन करण्याची बंजारा समाजाने जी धमकी दिली आहे ती खपवून घेणार नाही. जे लमाणी बेकायदा गोव्यात व्यवसाय चालवतात तो बंद करण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा १० लाख गोवेकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रेव्होल्युशनरी गोवन्स संस्थेतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. या वेळी या संस्थेचे सदस्य नाट्यकलाकार राजदीप नाईक, आरजे पंकज कुडतरकर, मनोज परब, निगम नाईक, सूरज नाईक, राज गोवेकर, माधवी परब आदी सदस्य उपस्थित होते. या संस्थेचा कोणा एका विशिष्ट समाजावर आरोप नाही; पण जे बेकायदारीत्या गोव्यात व्यवसाय करतात, पर्यटकांना त्रास देतात त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी राहिली असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली असून फक्त सोशल मीडियावर न राहता प्रत्यक्ष आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्याचे ते म्हणाले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या विधानाचे आपण समर्थन करत नसून त्यांनी आधी बिगर गोमंतकीयांची वोट बँक तयार केली आहे त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोव्यात येऊन हुकूमशाहीची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. गोव्यात स्थायिक झाल्यानंतर गोमंतकीयांची आडनावे लावून नावात बदल करण्याबाबत देखील नियंत्रण आले पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले. गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ उभी राहिली असल्याचे मनोज परब म्हणाले. आपल्या गोव्यात नीज गोंयकार लोकच दुर्मिळ होऊन बसले आहेत. बिगर गोमंतकीय येथे येतात व बेकायदा व्यवसाय चालवतात. रस्त्याच्या बाजूला नर्सरी उभारून, सिमेंट ब्लॉक्स घालून व्यवसाय करतात तसेच समुद्रकिनारी मसाज, टॅटूचे बेकायदा व्यवसाय चालवतात. उलट हेच लोक गोमंतकीयांकडे दादागिरी करतात. ते आता खपवून घेणार नाही. गोंयकारपणाचा नारा घेऊन जे सरकार स्थापन झाले आहे त्यांची देखील जबाबदारी असून गोंयकारपण टिकविण्यासाठी या विषयांकडे आधी लक्ष देणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले. या विषयावर गोवाभरातील तरुणांमध्ये जागृती केली जाईल व पुढचे पाऊल ठरविले जाणार, असे कुडतरकर यांनी सांगितले. नकारात्मक व समाजविरोधी घटक डोके वर काढत असून गोमंतकीयांनी सुशेगादपणा सोडून जागृत होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. वोट बँकेच्या नावाने बिगर गोमंतकीयांचे पालनपोषण करणे राजकीय पक्षांनी थांबवावे, असेही ते म्हणाले. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रशियनांनी विविध व्यवसाय उभारले असून तेथे भारतीयांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. हे कृत्य निषेधार्ह असून या विषयावर देखील आवाज उठवणार, असे राज गोवेकर म्हणाले. गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण आले पाहिजे. यामुळे गोव्यातील महिला देखील सुरक्षित नसल्याचे माधवी परब म्हणाल्या. (प्रतिनिधी)