शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीयांना गृहीत धरू नये

By admin | Updated: April 12, 2017 02:35 IST

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना घेऊन आंदोलन करण्याची बंजारा समाजाने जी धमकी दिली आहे ती खपवून घेणार नाही. जे लमाणी बेकायदा गोव्यात व्यवसाय चालवतात तो बंद करण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा १० लाख गोवेकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रेव्होल्युशनरी गोवन्स संस्थेतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. या वेळी या संस्थेचे सदस्य नाट्यकलाकार राजदीप नाईक, आरजे पंकज कुडतरकर, मनोज परब, निगम नाईक, सूरज नाईक, राज गोवेकर, माधवी परब आदी सदस्य उपस्थित होते. या संस्थेचा कोणा एका विशिष्ट समाजावर आरोप नाही; पण जे बेकायदारीत्या गोव्यात व्यवसाय करतात, पर्यटकांना त्रास देतात त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी राहिली असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली असून फक्त सोशल मीडियावर न राहता प्रत्यक्ष आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्याचे ते म्हणाले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या विधानाचे आपण समर्थन करत नसून त्यांनी आधी बिगर गोमंतकीयांची वोट बँक तयार केली आहे त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोव्यात येऊन हुकूमशाहीची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. गोव्यात स्थायिक झाल्यानंतर गोमंतकीयांची आडनावे लावून नावात बदल करण्याबाबत देखील नियंत्रण आले पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले. गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ उभी राहिली असल्याचे मनोज परब म्हणाले. आपल्या गोव्यात नीज गोंयकार लोकच दुर्मिळ होऊन बसले आहेत. बिगर गोमंतकीय येथे येतात व बेकायदा व्यवसाय चालवतात. रस्त्याच्या बाजूला नर्सरी उभारून, सिमेंट ब्लॉक्स घालून व्यवसाय करतात तसेच समुद्रकिनारी मसाज, टॅटूचे बेकायदा व्यवसाय चालवतात. उलट हेच लोक गोमंतकीयांकडे दादागिरी करतात. ते आता खपवून घेणार नाही. गोंयकारपणाचा नारा घेऊन जे सरकार स्थापन झाले आहे त्यांची देखील जबाबदारी असून गोंयकारपण टिकविण्यासाठी या विषयांकडे आधी लक्ष देणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले. या विषयावर गोवाभरातील तरुणांमध्ये जागृती केली जाईल व पुढचे पाऊल ठरविले जाणार, असे कुडतरकर यांनी सांगितले. नकारात्मक व समाजविरोधी घटक डोके वर काढत असून गोमंतकीयांनी सुशेगादपणा सोडून जागृत होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. वोट बँकेच्या नावाने बिगर गोमंतकीयांचे पालनपोषण करणे राजकीय पक्षांनी थांबवावे, असेही ते म्हणाले. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रशियनांनी विविध व्यवसाय उभारले असून तेथे भारतीयांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. हे कृत्य निषेधार्ह असून या विषयावर देखील आवाज उठवणार, असे राज गोवेकर म्हणाले. गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण आले पाहिजे. यामुळे गोव्यातील महिला देखील सुरक्षित नसल्याचे माधवी परब म्हणाल्या. (प्रतिनिधी)