शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवरच शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 18:56 IST

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवरच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे.

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवरच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसलाही या निवडणुका पक्षीय पातळीवर झालेल्या हव्या आहेत. सरकारने अजून त्याविषयी वेगळा कोणता निर्णय घेतलेला नसला तरी, जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवरच घेण्याची तरतूद कायद्यात आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या गेल्या. काँग्रेसने त्यावेळी विरोध केला होता. तथापि, सरकारने संबंधित कायद्यात दुरुस्ती करून जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या होत्या. काँग्रेसने त्यावेळी निषेध म्हणून जिल्हा पंचायत निवडणुकीत भाग घेतला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसने उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले, की जिल्हा पंचायत निवडणुका येत्या मार्चच्या दुस-या पंधरवड्यात होऊ शकतात. त्या पक्षीय पातळीवर घ्याव्यात की घेऊ नयेत हे अजून ठरलेले नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोग जाहीर करील पण आम्ही निवडणुकीला कधी सामोरे जाऊ शकतो हे आम्ही आयोगाला कळवले आहे.निवडणुका पुढे ढकला : मगोपदरम्यान, मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुका मार्चनंतर घ्या किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच घ्या अशी मागणी केली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्च महिन्यातही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. त्यामुळे त्या काळात व्यत्यय नको. त्यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुका मार्च महिन्यात घेण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी फेरविचार करावा, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे.