शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पणजीची स्थिती पाहून मी व्यथित झालोय ! विधानसभेत बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:05 IST

स्मार्ट सिटीची कामे झाली तरी पणजीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पणजीत स्मार्ट सिटीची कामे अपेक्षेप्रमाणे झालेली नाहीत. त्यामुळे पणजीवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची पणजीची स्थिती पाहून आमदार म्हणून आपण व्यथित झाल्याचे म्हणत मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत आपले दुःख व्यक्त केले.

स्मार्ट सिटीची कामे झाली तरी पणजीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबतची लक्षवेधी सूचना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली होती. त्यावर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हे विधान केले. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री मोन्सेरात म्हणाले, की स्मार्ट सिटीची कामे अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे पणजीवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार या नात्याने यामुळे आपण व्यथित झालो आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीची ही हालत झाली आहे. त्यावर बोलतानाही आपल्याला चांगले वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सरदेसाई म्हणाले, की स्मार्ट सिटीची कामे म्हणजे गैरव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. ही कामे करताना कुठलाही पूर्व अभ्यास न करताच रस्ते खणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पावसात पणजी बुडत आहे. स्मार्ट सिटीच्या कामांवर इतके पैसे खर्च केल्यानंतरही पणजी पावसात बुडाली, हे आश्चर्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, की स्मार्ट सिटीवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, कामे अपेक्षेप्रमाणे झाली नाहीत. हा एक घोटाळा असून, त्याची चौकशी व्हावी. कारण लोकांना त्याचा त्रास होत असल्याची टीका त्यांनी केली.

अधिकाऱ्यांनी 'वाट' लावली

स्मार्ट सिटीची कामे पावसाळ्यानंतर सहा महिन्यांनी पूर्ण होतील. स्मार्ट सिटी मंडळाचे माजी अधिकारी चौधरी यांच्या बेशिस्त कारभाराचा फटका स्मार्ट सिटीच्या कामांना बसला आहे. त्यांनीच स्मार्ट सिटी कामांची वाट लावली आहे. मात्र, आता त्यांच्या जागी दुसया अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

सभागृह समितीची मागणी फेटाळली

पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये घोळ झाला आहे. सदर कामांमुळे लोकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी करण्यासाठी सभागृह समिती स्थापन करावी, अशी मागणी विरोधी आमदारांनी केली. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मागणी फेटाळली.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा