शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आठवीपर्यंत उत्तीर्ण धोरणाच्या फेरआढाव्यासाठी आज चर्चा

By admin | Updated: August 24, 2015 02:03 IST

पणजी : आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत निर्णयासाठी शिक्षण खात्याने बोलावलेली शिक्षक संघटना आणि

पणजी : आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत निर्णयासाठी शिक्षण खात्याने बोलावलेली शिक्षक संघटना आणि संबंधित घटकांची बैठक सोमवारी (दि.२४) होणार आहे. खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना धोरण ठरविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे, त्या अनुषंगाने ही बैठक होत आहे. बहुतांश पालकांची पूर्वीप्रमाणे परीक्षा घेतल्या जाव्यात, अशीच मागणी आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इयत्ता आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद आहे. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नाही. ही पध्दत बदलण्याची मागणी गोव्यासह अन्य काही राज्यांनी केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत केलेली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून गोव्याला ही पध्दत बदलण्यास मुभा द्यावी, अशी विनंती याआधी केलेली आहे. १ एप्रिल २0१0 रोजी शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना केवळ श्रेणी देण्याची तरतूद आहे. यामुळे आठवीपर्यंत मुले सहज उत्तीर्ण होतात आणि नंतर नववी, दहावीत गटांगळ्या खातात. (प्रतिनिधी)