शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गोव्यात वाहनांना रस्ते करात मिळालेली सवलत 18 जानेवारीपर्यंत कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 19:56 IST

राज्यात जी नवी वाहने खरेदी केली जातात, त्यांच्या नोंदणीवेळी आकारल्या जाणा-या रस्ता करात सरकारने गेल्या ऑक्टोबरमध्ये 50 टक्के माफी जाहीर केली.

पणजी : राज्यात जी नवी वाहने खरेदी केली जातात, त्यांच्या नोंदणीवेळी आकारल्या जाणा-या रस्ता करात सरकारने गेल्या ऑक्टोबरमध्ये 50 टक्के माफी जाहीर केली. या सवलतीचा लाभ येत्या  18 जानेवारीपर्यंत सुरू ठेवता येईल काय याची पडताळणी सरकार करू लागले आहे. मंत्रिमंडळ बैठकीसमोर यापुढे निर्णयासाठी हा विषय येणार आहे.वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पन्नास टक्के रस्ता कर माफीची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली व 18 ऑक्टोबरपासून या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ केल्याने सरकारला महसुलाला मुकावे लागेल, अशा प्रकारचा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात आला होता. पण महसूल कमी झालेला नाही. मंत्री गुदिन्हो यांना शुक्रवारी मिरामार येथे एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारले असता, गुदिन्हो म्हणाले की गेल्या तीन महिन्यांत वाहन नोंदणीचे प्रमाण वाढले. रस्ता करात आम्ही सवलत दिली तरी, जीएसटीमध्ये कपात केली नाही. त्यामुळे जीएसटीद्वारे येणा-या महसुलाचे प्रमाण वाढले.गुदिन्हो म्हणाले, की दुचाकींच्या नोंदणीवर वाहतूक खात्याला एक कोटींच्या महसुलाला मुकावे लागले पण अत्यंत महागड्या अशा चारचाकी वाहनांची नोंदणी गोव्यात वाढली व त्यामुळे आम्हाला दहा कोटींचा अतिरिक्त महसूल मिळाला. कर सवलतीची मुदत ही येत्या 30 डिसेंबरला संपते. तरी देखील 18 जानेवारीपर्यंत सवलत सुरू ठेवण्यासाठी मला विषय मंत्रिमंडळासमोर न्यावा लागेल. तसा विचार मी करतोय. कारण नव्या वर्षी लोक वाहने खरेदी करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सवलत तीन महिन्यांसाठी आहे असे आरंभी म्हटले तरी, प्रत्यक्षात 18 ऑक्टोबरपासूनच अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे 18 जानेवारीपर्यंत सवलतीचा काळ वाढविण्याची शिफारस मी करीन.