शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

थकबाकीदारांचा वीजपुरवठा बंद करा; अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:39 IST

३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : थकीत बिले भरण्यासाठी वीज खात्याने एक रकमी फेड योजनेचा (ओटीएस) कालावधी आणखी महिनाभराने वाढवला आहे. ३१ मार्चपर्यंत बिलांची रक्कम न भरणाऱ्यांची तसेच ज्यांची बिले तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थकलेली आहेत, अशा ग्राहकांचीही वीज तोडण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास टाळाटाळ केल्यास कनिष्ठ अभियंता व साहाय्यक अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा ढवळीकर यांनी  दिला आहे. ओटीएसची महिनाभराची मुदत काल संपली. अजूनही अनेकजण थकीत बिले भरणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ढवळीकर म्हणाले की, १२ महिन्यांच्या कालावधीत हप्त्याहप्त्यांनी थकीत रक्कम भरण्याचा पर्याय अनेकांनी निवडला. त्यामुळे खात्याचे काही नुकसान झालेले नाही. उर्वरित कालावधीचा २ टक्के दंड तेवढा माफ झाला. परंतु ज्यांनी या योजनेचा फायदा घेऊन एकाचवेळेला थकीत बिलाची सर्व रक्कम भरली त्यांच्याबाबतीत मात्र डीपीसी वजा झाल्याने नकसान झाले खात्याला थोडेफार नुकसान झाले. 

वीज तोडल्याशिवाय लोक पैसे भरणार नाहीत

काही जण मुद्दामहून बिले न भरता थकबाकी ठेवतात. काहीजणांची बिले परिस्थितीमुळे थकलेली चुकून आहे. तर काहीजणांकडे चुकून थकबाकी राहिली खात्याने आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बाकी असलेल्या थकबाकी ग्राहकांची वीज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीज तोडल्याशिवाय कोणी बिले भरण्यास पुढे येणार नाहीत. पुढील महिनाभरात सर्व काही स्ट्रीमलाइन हो आणि जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल, असा इशाराही ढवळीकरांनी दिला

४०० कोटींचे टार्गेट

२०२० साली नीलेश काब्राल वीजमंत्री असताना ओटीएस सुरु करण्यात आली. मात्र सुरुवातीला या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दहा टक्केही ग्राहक फिरकले नाहीत. सुमारे १ लाख ४० हजार ग्राहकांकडे बिलांची थकबाकी होती. प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर दोन ते तीन वेळा ओटीएस पुन्हा खुली करण्यात आली. ४०० कोटी रुपये थकबाकी वसूल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अद्याप त्यातील निम्मीही थकबाकी वसूल झालेली नाही.

ग्राहकांच्या तक्रारी

दरम्यान, ग्राहकांच्याही काही तक्रारी आहेत. मध्यंतरी भरमसाट रकमेची वीज बिले दिली गेल्याने अनेकांनी ती भरली नाहीत आणि त्यामुळे थकबाकी राहिली. ओटीएसच्या नावाखाली खात्याचे कर्मचारी ग्राहकांचा छळ करतात, अशा तक्रारीही अधून मधून येत असतात. काही ग्राहकांचे असे म्हणणे आहे की, सर्व थकबाकी भरली तरी नंतर ती पुन्हा बिलामध्ये दाखवण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाelectricityवीज