शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

थकबाकीदारांचा वीजपुरवठा बंद करा; अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:39 IST

३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : थकीत बिले भरण्यासाठी वीज खात्याने एक रकमी फेड योजनेचा (ओटीएस) कालावधी आणखी महिनाभराने वाढवला आहे. ३१ मार्चपर्यंत बिलांची रक्कम न भरणाऱ्यांची तसेच ज्यांची बिले तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थकलेली आहेत, अशा ग्राहकांचीही वीज तोडण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास टाळाटाळ केल्यास कनिष्ठ अभियंता व साहाय्यक अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा ढवळीकर यांनी  दिला आहे. ओटीएसची महिनाभराची मुदत काल संपली. अजूनही अनेकजण थकीत बिले भरणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ढवळीकर म्हणाले की, १२ महिन्यांच्या कालावधीत हप्त्याहप्त्यांनी थकीत रक्कम भरण्याचा पर्याय अनेकांनी निवडला. त्यामुळे खात्याचे काही नुकसान झालेले नाही. उर्वरित कालावधीचा २ टक्के दंड तेवढा माफ झाला. परंतु ज्यांनी या योजनेचा फायदा घेऊन एकाचवेळेला थकीत बिलाची सर्व रक्कम भरली त्यांच्याबाबतीत मात्र डीपीसी वजा झाल्याने नकसान झाले खात्याला थोडेफार नुकसान झाले. 

वीज तोडल्याशिवाय लोक पैसे भरणार नाहीत

काही जण मुद्दामहून बिले न भरता थकबाकी ठेवतात. काहीजणांची बिले परिस्थितीमुळे थकलेली चुकून आहे. तर काहीजणांकडे चुकून थकबाकी राहिली खात्याने आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बाकी असलेल्या थकबाकी ग्राहकांची वीज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीज तोडल्याशिवाय कोणी बिले भरण्यास पुढे येणार नाहीत. पुढील महिनाभरात सर्व काही स्ट्रीमलाइन हो आणि जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल, असा इशाराही ढवळीकरांनी दिला

४०० कोटींचे टार्गेट

२०२० साली नीलेश काब्राल वीजमंत्री असताना ओटीएस सुरु करण्यात आली. मात्र सुरुवातीला या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दहा टक्केही ग्राहक फिरकले नाहीत. सुमारे १ लाख ४० हजार ग्राहकांकडे बिलांची थकबाकी होती. प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर दोन ते तीन वेळा ओटीएस पुन्हा खुली करण्यात आली. ४०० कोटी रुपये थकबाकी वसूल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अद्याप त्यातील निम्मीही थकबाकी वसूल झालेली नाही.

ग्राहकांच्या तक्रारी

दरम्यान, ग्राहकांच्याही काही तक्रारी आहेत. मध्यंतरी भरमसाट रकमेची वीज बिले दिली गेल्याने अनेकांनी ती भरली नाहीत आणि त्यामुळे थकबाकी राहिली. ओटीएसच्या नावाखाली खात्याचे कर्मचारी ग्राहकांचा छळ करतात, अशा तक्रारीही अधून मधून येत असतात. काही ग्राहकांचे असे म्हणणे आहे की, सर्व थकबाकी भरली तरी नंतर ती पुन्हा बिलामध्ये दाखवण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाelectricityवीज