शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर यापुढे जप्ती किंवा थेट लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:46 IST

वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही.

पणजी : वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही. तीन महिन्यांच्या आत दस्तऐवज सादर न केल्यास हे वाहन लिलावांद्वारे  विकण्याचा अधिकारही न्यायदंडाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.सरकारने गोवा मोटर वाहन नियम १९९१ मध्ये दुरुस्ती करून वरील तरतूद केली आहे. या दुरुस्तीनुसार २९९ अ नियमानुसार वाहनमालकाने या वाहनासाठी त्रयस्थाचा अपघात विमा उतरविणे सक्तीचे आहे, जेणेकरून एखादेवेळी अपघात घडल्यास अपघातात सापडणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला विम्याची भरपाई मिळू शकेल. अनेक वाहनधारक केवळ वाहनाचा विमा उतरवित असत, त्रयस्थाचा विमा उतरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असत. अशा वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्रयस्थाच्या विम्यासंबंधी कागदपत्रांची मागणी केल्यावर वाहनधारकाने संबंधित कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना सादर करावी लागतील. विम्याच्या दाव्याची जी रक्कम देय असेल त्यासंबंधी आवश्यक ती हमी सादर केल्यानंतर तसेच कोर्टाचे त्यावर समाधान झाले तरच वाहन मुक्त करता येईल. वाहनधारकाने त्रयस्थ व्यक्तीचा अपघाती विमा उतरविला नसेल तर किंवा तीन महिन्यात त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्यास वाहनमालक अपयशी ठरला असेल संबंधित वाहन लिलांवात वाढले जाईल. अपघात ज्या क्षेत्रात घडला त्या क्षेत्राच्या दंडाधिकाऱ्यांना हा अधिकार बहाल करण्यात आला आहे. वाहन विक्रीतून आलेली रक्कम १५ दिवसांत दावा लवादाकडे जमा करावी जेणेकरून त्रयस्थाला नुकसान भरपाई देता येईल, असे या नियम दुरुस्तीत म्हटले आहे.वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार १९८८ च्या केंद्रीय मोटर वाहन कायदा कलम २६, २८, ३८, ६५, ९५, ९६, १0७, १११, १३८, १५९, १७६ व २१३ खाली बहाल करण्यात आलेल्या अधिकारानुसार ही नियम दुरुस्ती करण्यात आलेली आहे. नियमदुरुस्तीचा मसुदा जनतेच्या हरकती, सूचनांसाठी गेल्या १९ आॅक्टोबरपासून १५ दिवस खुला ठेवण्यात आला होता. परंतु कोणत्याही हरकती किंवा सूचना न आल्याने अधिसूचना काढण्यात आलेली आहे. राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या वर्षी २0१७ मध्ये राज्यात ३९१७ अपघातांची नोंद झाली त्यात ३0६ बळी गेले. ३५३६ अपघात वेगात वाहन हाकल्यामुळे घडले. मृतांपैकी ८२ जण २५ ते ३५ वयोगटातील तरुण होते. दरवर्षी राज्यात रस्ता अपघातांमध्ये सरासरी ३00 बळी जातात.

टॅग्स :carकार