शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अपघातग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर यापुढे जप्ती किंवा थेट लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:46 IST

वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही.

पणजी : वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही. तीन महिन्यांच्या आत दस्तऐवज सादर न केल्यास हे वाहन लिलावांद्वारे  विकण्याचा अधिकारही न्यायदंडाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.सरकारने गोवा मोटर वाहन नियम १९९१ मध्ये दुरुस्ती करून वरील तरतूद केली आहे. या दुरुस्तीनुसार २९९ अ नियमानुसार वाहनमालकाने या वाहनासाठी त्रयस्थाचा अपघात विमा उतरविणे सक्तीचे आहे, जेणेकरून एखादेवेळी अपघात घडल्यास अपघातात सापडणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला विम्याची भरपाई मिळू शकेल. अनेक वाहनधारक केवळ वाहनाचा विमा उतरवित असत, त्रयस्थाचा विमा उतरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असत. अशा वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्रयस्थाच्या विम्यासंबंधी कागदपत्रांची मागणी केल्यावर वाहनधारकाने संबंधित कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना सादर करावी लागतील. विम्याच्या दाव्याची जी रक्कम देय असेल त्यासंबंधी आवश्यक ती हमी सादर केल्यानंतर तसेच कोर्टाचे त्यावर समाधान झाले तरच वाहन मुक्त करता येईल. वाहनधारकाने त्रयस्थ व्यक्तीचा अपघाती विमा उतरविला नसेल तर किंवा तीन महिन्यात त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्यास वाहनमालक अपयशी ठरला असेल संबंधित वाहन लिलांवात वाढले जाईल. अपघात ज्या क्षेत्रात घडला त्या क्षेत्राच्या दंडाधिकाऱ्यांना हा अधिकार बहाल करण्यात आला आहे. वाहन विक्रीतून आलेली रक्कम १५ दिवसांत दावा लवादाकडे जमा करावी जेणेकरून त्रयस्थाला नुकसान भरपाई देता येईल, असे या नियम दुरुस्तीत म्हटले आहे.वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार १९८८ च्या केंद्रीय मोटर वाहन कायदा कलम २६, २८, ३८, ६५, ९५, ९६, १0७, १११, १३८, १५९, १७६ व २१३ खाली बहाल करण्यात आलेल्या अधिकारानुसार ही नियम दुरुस्ती करण्यात आलेली आहे. नियमदुरुस्तीचा मसुदा जनतेच्या हरकती, सूचनांसाठी गेल्या १९ आॅक्टोबरपासून १५ दिवस खुला ठेवण्यात आला होता. परंतु कोणत्याही हरकती किंवा सूचना न आल्याने अधिसूचना काढण्यात आलेली आहे. राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या वर्षी २0१७ मध्ये राज्यात ३९१७ अपघातांची नोंद झाली त्यात ३0६ बळी गेले. ३५३६ अपघात वेगात वाहन हाकल्यामुळे घडले. मृतांपैकी ८२ जण २५ ते ३५ वयोगटातील तरुण होते. दरवर्षी राज्यात रस्ता अपघातांमध्ये सरासरी ३00 बळी जातात.

टॅग्स :carकार