शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

“एवढे दरोडे पडले तरी, देशाची सांस्कृतिक श्रीमंती कमी झाली नाही”: शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 09:12 IST

हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असे शरद पोंक्षे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भारताचा इतिहास आजचा असो किंवा कालचा. भारत हा हिंदूंचा देश आहे. हिंदू धर्मियांचे हे राष्ट्र आहे, हे सत्य नाकारता येत नाही. आपल्या भारतामध्ये पाचव्या, सहाव्या शतकापासून आक्रमण होत आहे, कारण आपल्या देशात काही लुटण्यासारखे आहे म्हणून. एवढे दरोडे पडले तरीही आपल्या देशाची श्रीमंत संस्कृती अजून कमी होऊ शकली नाही, मत व्याख्याते तसेच लेखक शरद पोंक्षे यांनी मांडले.

फोंडा येथील राजीव कला मंदिरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानतर्फे 'स्वातंत्र्याचे पूर्व रंग' कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताचे स्वातंत्र्य काल आज उद्या' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते. भारताची हिंदू संस्कृती खूप मोठी आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. भारत हा देशात पराक्रमी, वीर पुरुष, संत, विज्ञानवाद्यांची. देव देवतांची भूमी आहे. संपूर्ण जगाला ज्ञानविज्ञान देणारी ही संस्कृती आहे. आपली वेदांची पुस्तके लुटून घेऊन जाऊ शकतात. मात्र, या वेदांमध्ये सांगितलेले आहे व लोकांनी आपल्या आचरणामध्ये अनुकरण केले आहे ती संस्कृती कसे लुटू नेऊ शकतील? असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, पवित्र संतांनी भारतभूमी मध्ये का जन्म घेतला, श्रीकृष्ण, श्रीराम तसेच अन्य संतांनी या भूमीत का जन्म घेतला हा इतिहास जाणन घ्यावा. प्रत्येक माणसाची एक जगण्याची फिलॉसॉफी आहे. मूलभूत तत्वे आहेत. ती तत्वे इथे जन्माला आली. भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. आपण जगाला शून्य दिला. त्यामुळे गणित तयार होऊ शकलं. 

जाती कोणी तयार केल्या याचा अभ्यास न करता, इतिहास न जाणता खोटे पसरवण्याचे गलिच्छ काम स्वातंत्र्यानंतर करण्यात आले. आजही ते विकोप्याला गेले आहे. उद्याचा भारत घडवायचा असल्यास जातीमधील भेदभावांवर पहिल्यांदा प्रहार करावा लागेल, असेही पोंक्षे म्हणाले. 

इतर धर्माचे लोक संकट आल्यावर एकत्र येऊन लढा देतात. मात्र हिंदूवर कोणतेही संकट आले तर एकोपा नसतो. वज्रमूठ होण्यासाठी सर्व बोटे एकत्र यावी लागतील. हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपली सर्वांची एकच संस्कृती आहे व ती म्हणजे हिंदू संस्कृती. आपल्या देशात कोणी दत्ताचे, कोणी गणपती तर कोणी महादेवाचे भक्त आहेत.. मात्र, आपली नाळ ही एकच आहे व ती म्हणजे हिंदू संस्कृतीची. इतरांना माणुसकीने व प्रेमाने वागण्याची संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती आहे. आपल्याला उद्याचा भारत घडवायचा असल्यास आपल्या हातात काही गोष्टी आहेत, ते म्हणजे मतदान. मतदानातून आपण अनेक गोष्टी घडवू शकतो. बदलू शकतो, यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जो हिंदू हिताचा विचार करेल तो देशावर राज्य करेल. हा दृढ निश्चय हिंदू लोकांनी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाSharad Ponksheशरद पोंक्षे