शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2024 13:07 IST

सहकारी सोसायट्यांसाठी कठोर कायदा आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सहकारी बँकेमधील ठेवीदारांचे पैसे यापुढे बुड्डू देणार नाही. यासाठी आवश्यक असणारा कायदा देखील आम्ही करू. सहकारी बँकेत घोटाळे होऊ नये यासाठी बँकेला सरकारशी जोडण्यात येईल तसेच सरकारच्या काही चांगल्या योजना सहकारी बँकेसोबत संलग्न करण्याचा विचार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सहकार बँकेच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, संचालक उमेश शिरोडकर, श्रीकांत नाईक, प्रभाकर गांवकर, व्यावसायिक संचालक अनंत चोडणकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यावेळी अनेक आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सहकार क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी बँक यासारख्या अनेक सहकारी बँका बंद पडल्या. राज्य सहकारी बँक देखील बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु या बँकेचे मेहनती पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे व सरकारच्या मदतीने ही बँक पुन्हा नफ्यात आली. ही वाटचाल अशीच ठेवण्यासाठी व्यवस्थापकांनी काम केले पाहिजे. मुळात सहकार क्षेत्रात आता जास्तीत जास्त युवकांनी येणे आवश्यक आहे, तरच भविष्यात सहकार क्षेत्र बहरेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

२५ वर्षांचे नियोजन करा

सहकार क्षेत्राने इतर क्षेत्रांना सोबत घेऊन चालणे आवश्यक आहे. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत या गोष्टी खूप आवश्यक आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्यावा. निदान पुढच्या २५ वर्षांचे नियोजन करून ठेवावे. २५ वर्षांचे ध्येय घेऊन वाटचाल केल्यास निश्चितच बँकांना चांगला नफा मिळवण्यास यश येणार आहे. सरकारकडून लागणारी आवश्यक मदत आम्ही करायला तयार आहोत, असेही डॉ. सावंत यांनी म्हणाले.

बँकेतून जुनी कागदपत्रे, भंगार काढा : शिरोडकर 

राज्य सहकारी बँकेकडून काही अपेक्षा आहेत. जुन्या कागदपत्रांसह सर्व भंगार बँकेतून काढून बँक स्वच्छ ठेवावी. बँकेचा व्यवहार वाढावा यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्न करावे. सहकार क्षेत्राची सुमारे १५ हजार कोटी उलाढाल आहे. त्यात वाढ व्हावी. प्रत्येक सहकार बँकेने ५०० ते १००० कोटी रुपयांची उलाढाल करण्यावर भर द्यावा. यासाठी व्यवहार पारदर्शक करणे व व्यवहार वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हायला असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत