शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2024 13:07 IST

सहकारी सोसायट्यांसाठी कठोर कायदा आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सहकारी बँकेमधील ठेवीदारांचे पैसे यापुढे बुड्डू देणार नाही. यासाठी आवश्यक असणारा कायदा देखील आम्ही करू. सहकारी बँकेत घोटाळे होऊ नये यासाठी बँकेला सरकारशी जोडण्यात येईल तसेच सरकारच्या काही चांगल्या योजना सहकारी बँकेसोबत संलग्न करण्याचा विचार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सहकार बँकेच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, संचालक उमेश शिरोडकर, श्रीकांत नाईक, प्रभाकर गांवकर, व्यावसायिक संचालक अनंत चोडणकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यावेळी अनेक आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सहकार क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी बँक यासारख्या अनेक सहकारी बँका बंद पडल्या. राज्य सहकारी बँक देखील बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु या बँकेचे मेहनती पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे व सरकारच्या मदतीने ही बँक पुन्हा नफ्यात आली. ही वाटचाल अशीच ठेवण्यासाठी व्यवस्थापकांनी काम केले पाहिजे. मुळात सहकार क्षेत्रात आता जास्तीत जास्त युवकांनी येणे आवश्यक आहे, तरच भविष्यात सहकार क्षेत्र बहरेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

२५ वर्षांचे नियोजन करा

सहकार क्षेत्राने इतर क्षेत्रांना सोबत घेऊन चालणे आवश्यक आहे. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत या गोष्टी खूप आवश्यक आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्यावा. निदान पुढच्या २५ वर्षांचे नियोजन करून ठेवावे. २५ वर्षांचे ध्येय घेऊन वाटचाल केल्यास निश्चितच बँकांना चांगला नफा मिळवण्यास यश येणार आहे. सरकारकडून लागणारी आवश्यक मदत आम्ही करायला तयार आहोत, असेही डॉ. सावंत यांनी म्हणाले.

बँकेतून जुनी कागदपत्रे, भंगार काढा : शिरोडकर 

राज्य सहकारी बँकेकडून काही अपेक्षा आहेत. जुन्या कागदपत्रांसह सर्व भंगार बँकेतून काढून बँक स्वच्छ ठेवावी. बँकेचा व्यवहार वाढावा यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्न करावे. सहकार क्षेत्राची सुमारे १५ हजार कोटी उलाढाल आहे. त्यात वाढ व्हावी. प्रत्येक सहकार बँकेने ५०० ते १००० कोटी रुपयांची उलाढाल करण्यावर भर द्यावा. यासाठी व्यवहार पारदर्शक करणे व व्यवहार वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हायला असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत