शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2024 13:07 IST

सहकारी सोसायट्यांसाठी कठोर कायदा आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सहकारी बँकेमधील ठेवीदारांचे पैसे यापुढे बुड्डू देणार नाही. यासाठी आवश्यक असणारा कायदा देखील आम्ही करू. सहकारी बँकेत घोटाळे होऊ नये यासाठी बँकेला सरकारशी जोडण्यात येईल तसेच सरकारच्या काही चांगल्या योजना सहकारी बँकेसोबत संलग्न करण्याचा विचार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सहकार बँकेच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, संचालक उमेश शिरोडकर, श्रीकांत नाईक, प्रभाकर गांवकर, व्यावसायिक संचालक अनंत चोडणकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यावेळी अनेक आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सहकार क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी बँक यासारख्या अनेक सहकारी बँका बंद पडल्या. राज्य सहकारी बँक देखील बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु या बँकेचे मेहनती पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे व सरकारच्या मदतीने ही बँक पुन्हा नफ्यात आली. ही वाटचाल अशीच ठेवण्यासाठी व्यवस्थापकांनी काम केले पाहिजे. मुळात सहकार क्षेत्रात आता जास्तीत जास्त युवकांनी येणे आवश्यक आहे, तरच भविष्यात सहकार क्षेत्र बहरेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

२५ वर्षांचे नियोजन करा

सहकार क्षेत्राने इतर क्षेत्रांना सोबत घेऊन चालणे आवश्यक आहे. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत या गोष्टी खूप आवश्यक आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्यावा. निदान पुढच्या २५ वर्षांचे नियोजन करून ठेवावे. २५ वर्षांचे ध्येय घेऊन वाटचाल केल्यास निश्चितच बँकांना चांगला नफा मिळवण्यास यश येणार आहे. सरकारकडून लागणारी आवश्यक मदत आम्ही करायला तयार आहोत, असेही डॉ. सावंत यांनी म्हणाले.

बँकेतून जुनी कागदपत्रे, भंगार काढा : शिरोडकर 

राज्य सहकारी बँकेकडून काही अपेक्षा आहेत. जुन्या कागदपत्रांसह सर्व भंगार बँकेतून काढून बँक स्वच्छ ठेवावी. बँकेचा व्यवहार वाढावा यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्न करावे. सहकार क्षेत्राची सुमारे १५ हजार कोटी उलाढाल आहे. त्यात वाढ व्हावी. प्रत्येक सहकार बँकेने ५०० ते १००० कोटी रुपयांची उलाढाल करण्यावर भर द्यावा. यासाठी व्यवहार पारदर्शक करणे व व्यवहार वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हायला असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत