शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सहा आठवड्यांत बेकायदा बांधकामे पाडा; हायकोर्टाकडून अखेरची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:03 IST

पंचायतींसह अधिकाऱ्यांची धावपळ; सरकारने मार्ग काढण्याची लोकांची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ग्रामपंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने पंचायतींना मुदतवाढ दिली आहे. आता सहा आठवड्यांच्या आत बेकायदेशीर बांधकामे पंचायतींना पाडावी लागणार आहेत आणि न्यायालयाला माहिती द्यावी लागणार आहे. ही अखेरची मुदतवाढ असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

राज्यातील बेकायदा बांधकामांबाबत खंडपीठाने घेतलेली स्वेच्छा दखल याचिका बुधवारी सुनावणीस आली. बहुतांश पंचायतींनी याबाबत कार्यवाहीचा अहवाल सादर केलेला नाही, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली. न्यायालयाने मुदतवाढीची मागणी मंजूर करत पुढील सहा आठवड्यांत कारवाई करण्याचा आदेश दिला, तसेच कारवाई अहवालही या मुदतीत सादर करण्यास सांगितले, तसेच मुदत आणखी वाढविण्यात येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे पंचायतींसाठी ही अखेरची संधी असेल.

न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यभरात पुन्हा एकदा धावपळ उडाली आहे. पंचायत सचिव, तलाठी वगैरे पुन्हा बांधकामाच्या पाहणीसाठी फिरू लागले आहेत. बेकायदा बांधकामांवर नोटिसा आणि कारणे दाखवा नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी पंचायतींना बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती द्यावी लागणार आहे. नगरपालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांबाबत कारवाई करण्यास पालिकांकडून मुदतवाढ मागितली होती. त्यांना न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर

बेकायदेशीर बांधकामे दीड महिन्याच्या आत पाडण्याचा न्यायालयाचा आदेश हा गोवा विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर देण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत आहेत. भर पावसाळ्यात बांधकामे पाडली जातील या शक्यतेने संबंधित लोक भयभीत झाले आहेत. ते लोकप्रतिनिधींकडे धाव घेत आहेत. सरकारनेही आजवर याबाबतीत आश्वासन देण्यापलीकडे अद्याप काहीच केलेले नाही. त्यामुळे सरकारची डोकेदुखी निश्चितच वाढली आहे.

धोरणाची अद्याप प्रतीक्षा

दरम्यान, लोकांची घरे वाचविण्यासाठी धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; परंतु ते धोरणही अजून तयार झालेले नाही; तसेच धोरण बनवले तरी त्याला मर्यादा असणारच आहेत. कारण अनेक ठिकाणी अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आल्याचेही आढळून आले आहे.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय