शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ड्युटी करत तुटणारे संसारही वाचवले; सर्वच पर्यटक 'अतिथी देवो भव:' नसतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:59 IST

कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत'शी वार्तालाप केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कळंगुटचेच भाग बनलेल्या माझ्या कळंगुट पोलिसांनी ड्युटी करता करता अनेकवेळा पती पत्नीमधील वादही सोडवून त्यांचे संसार सावरण्याचे काम केलेले आहे, असे गौरवोद्गार कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत'शी वार्तालाप करताना काढले.

पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक हे पोलिस स्थानकाची शक्तीस्थाने असतात. त्यांच्याच जिवावर कायदा व सुव्यवस्था ही राखली जाते. कळंगुट पोलिस स्थानकात एक चांगले वातावरण निर्मिती करण्याचे काम ८ महिन्यांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळताना दिसत आहे, असे ते म्हणाले. कॉन्स्टेबलपासून सर्वजण आपले योगदान देत असतात. रात्री-अपरात्री केव्हाही ते तत्पर असतात. प्रसंगी वैयक्तिक कौटुंबिक सोहळे यांना ते मुकतात. यालाच पोलिसांचे जीवन असे म्हणतात याची त्यांना जाणीव आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

लोकांना पोलीस स्थानकात आपली तक्रार घेऊन येण्यासाठी विश्वास वाटला पाहिजे, अशा वातावरणाची निर्मिती करण्यात यश मिळाल्याचे ते सांगतात. पर्यटक आणि स्थानिक यात होणारे वाढत्या वादांविषयी विचारले असता ते म्हणाले की त्यात कधी पर्यटकांची चूक असते तर कधी स्थानिकांचीही असते. 'अतिथी: देवो भव:' ही आमची संस्कृती असली तरी सर्वच अतिथी हे देव मानण्याच्या लायकीचे असत नाहीत, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कठोर व्हावेच लागते, असेही त्यांनी सांगितले. पोलिस यासाठी नेहमीच सज्ज असतात. त्यांना सामाजिक जबाबदारीही असते. असे दत्तगुरू सावंत यांन सांगितले.

चांगले काम केल्यास झोप लागतेच

रात्री चांगली झोप लागेल, असे काम दिवसा करावे म्हणजे काहीच समस्या होत नाहीत. आमिषे, आकर्षणे या गोष्टी प्रत्येक क्षेत्रात असतात, पोलीस सेवेत हे अधिक आहे. परंतु स्वतः किमान काही गोष्टी ठरवायच्या असतात आणि त्यांचे पालन करायचे असते. मग काहीच अडचणी येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

आणखी मनुष्यबळ हवे

सावंत म्हणाले की, कळंगुट स्थानकात सध्या ९० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु हे मनुष्यबळ अपुरे पडते. २०१४ साली हा कर्मचारी वर्ग मंजूर झाला होता. त्यानंतर कळंगुटची लोकसंख्या वाढली. पर्यटकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा