शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

राज्यातील धरणे सध्या ५० ते ७० टक्के भरलेली; जलशुद्धीकरण प्रकल्पांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:44 IST

यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उन्हाळा जवळ येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील धरणे ५० ते ७० टक्के भरलेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांची गरज भागवणारे साळावली धरण ७३ टक्के भरले आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे. ७ जुलै २०२२ रोजी साळावली धरण तुडुंब भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला. धरणातील पाण्याची पातळी क्षमतेच्याही वर ११० टक्क्यांवर पोचली. काणकोण तालुक्याची तहान भागवणाऱ्या चापोली धरणाची पाणी पातळी ७२ टक्के आहे.

बार्देश आणि डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे जलाशयातील पातळी ६९ टक्के आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत गोव्याला तिळारी कालव्यांची सुमारे २२ वर्षांनी मोठी डागडुजी हाती घेण्यात आली. त्यामुळे काहीशी समस्या झाली. आमठाणे धरणातून पंपिंग करून पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला घेण्यात आले.

सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे धरणाची पाण्याची पातळी ५६ टक्के आहे. गावणे व पंचवाडी धरणे अनुक्रमे ६५ टक्के व ४८ टक्के भरलेली आहेत. गोव्यात नद्यांवर ३०० पेक्षा जास्त बंधारे आहेत, जेथे कच्चे पाणी साठवले जाते. उन्हाळ्यात कमतरता भासल्यास हे पाणी वापरले जाते. चांदेल आणि कळणा येथे बंधारे आहेत. तेथून पाणी उपसून पेडणे तालुक्याची गरज भागवली जाते. शापोरा व साळ येथील बंधाऱ्यांमधून पाणी उपसा करून येथील पाणी घेतले जाते. खांडेपार नदीवर आणखी १४ बंधारे आहेत, तेथून ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा