शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

राज्यातील धरणे सध्या ५० ते ७० टक्के भरलेली; जलशुद्धीकरण प्रकल्पांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:44 IST

यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उन्हाळा जवळ येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील धरणे ५० ते ७० टक्के भरलेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांची गरज भागवणारे साळावली धरण ७३ टक्के भरले आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे. ७ जुलै २०२२ रोजी साळावली धरण तुडुंब भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला. धरणातील पाण्याची पातळी क्षमतेच्याही वर ११० टक्क्यांवर पोचली. काणकोण तालुक्याची तहान भागवणाऱ्या चापोली धरणाची पाणी पातळी ७२ टक्के आहे.

बार्देश आणि डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे जलाशयातील पातळी ६९ टक्के आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत गोव्याला तिळारी कालव्यांची सुमारे २२ वर्षांनी मोठी डागडुजी हाती घेण्यात आली. त्यामुळे काहीशी समस्या झाली. आमठाणे धरणातून पंपिंग करून पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला घेण्यात आले.

सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे धरणाची पाण्याची पातळी ५६ टक्के आहे. गावणे व पंचवाडी धरणे अनुक्रमे ६५ टक्के व ४८ टक्के भरलेली आहेत. गोव्यात नद्यांवर ३०० पेक्षा जास्त बंधारे आहेत, जेथे कच्चे पाणी साठवले जाते. उन्हाळ्यात कमतरता भासल्यास हे पाणी वापरले जाते. चांदेल आणि कळणा येथे बंधारे आहेत. तेथून पाणी उपसून पेडणे तालुक्याची गरज भागवली जाते. शापोरा व साळ येथील बंधाऱ्यांमधून पाणी उपसा करून येथील पाणी घेतले जाते. खांडेपार नदीवर आणखी १४ बंधारे आहेत, तेथून ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा