शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राज्यातील धरणे सध्या ५० ते ७० टक्के भरलेली; जलशुद्धीकरण प्रकल्पांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:44 IST

यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उन्हाळा जवळ येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील धरणे ५० ते ७० टक्के भरलेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांची गरज भागवणारे साळावली धरण ७३ टक्के भरले आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे. ७ जुलै २०२२ रोजी साळावली धरण तुडुंब भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला. धरणातील पाण्याची पातळी क्षमतेच्याही वर ११० टक्क्यांवर पोचली. काणकोण तालुक्याची तहान भागवणाऱ्या चापोली धरणाची पाणी पातळी ७२ टक्के आहे.

बार्देश आणि डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे जलाशयातील पातळी ६९ टक्के आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत गोव्याला तिळारी कालव्यांची सुमारे २२ वर्षांनी मोठी डागडुजी हाती घेण्यात आली. त्यामुळे काहीशी समस्या झाली. आमठाणे धरणातून पंपिंग करून पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला घेण्यात आले.

सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे धरणाची पाण्याची पातळी ५६ टक्के आहे. गावणे व पंचवाडी धरणे अनुक्रमे ६५ टक्के व ४८ टक्के भरलेली आहेत. गोव्यात नद्यांवर ३०० पेक्षा जास्त बंधारे आहेत, जेथे कच्चे पाणी साठवले जाते. उन्हाळ्यात कमतरता भासल्यास हे पाणी वापरले जाते. चांदेल आणि कळणा येथे बंधारे आहेत. तेथून पाणी उपसून पेडणे तालुक्याची गरज भागवली जाते. शापोरा व साळ येथील बंधाऱ्यांमधून पाणी उपसा करून येथील पाणी घेतले जाते. खांडेपार नदीवर आणखी १४ बंधारे आहेत, तेथून ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा