शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:31 IST

तिळारी भरण्याच्या मार्गावर  

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: तिळारी वगळल्यास राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र, पुराची कुठलीही भीती नसल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल विधानसभेत दिली.

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झालेले नाही. मात्र, धरणाच्या स्पिल-वेवरून पाणी येत आहे. गोव्यात सर्व धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, गोव्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. परंतु, पुराचा धोका नाही. डिचोली, शिवोली, कांदोळी येथे पावसाचे पाणी साचले होते. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने चिंतेची बाब नाही. तिळारी मात्र ओव्हरफ्लो झाले नसल्याने स्थिती नियंत्रणात आहे. तिळारी धरणाचे दरवाजे दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी बंद केले जातात. त्यामुळे ते नियोजित दिवशी बंद केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात साळावली, चापोली, अंजुणे, आमठाणे, म्हैसाळ, आदी धरणांमध्ये जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने ही धरणे आतापासूनच तुडुंब वाहू लागली आहेत. त्यामुळे मध्यंतरी सरकारने या धरण परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशाराही जारी केला होता. मात्र, सध्या धरणांबाबतची स्थिती नियंत्रणाखाली आहे.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन