शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:31 IST

तिळारी भरण्याच्या मार्गावर  

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: तिळारी वगळल्यास राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र, पुराची कुठलीही भीती नसल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल विधानसभेत दिली.

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झालेले नाही. मात्र, धरणाच्या स्पिल-वेवरून पाणी येत आहे. गोव्यात सर्व धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, गोव्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. परंतु, पुराचा धोका नाही. डिचोली, शिवोली, कांदोळी येथे पावसाचे पाणी साचले होते. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने चिंतेची बाब नाही. तिळारी मात्र ओव्हरफ्लो झाले नसल्याने स्थिती नियंत्रणात आहे. तिळारी धरणाचे दरवाजे दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी बंद केले जातात. त्यामुळे ते नियोजित दिवशी बंद केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात साळावली, चापोली, अंजुणे, आमठाणे, म्हैसाळ, आदी धरणांमध्ये जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने ही धरणे आतापासूनच तुडुंब वाहू लागली आहेत. त्यामुळे मध्यंतरी सरकारने या धरण परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशाराही जारी केला होता. मात्र, सध्या धरणांबाबतची स्थिती नियंत्रणाखाली आहे.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन