शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: December 2, 2022 17:19 IST

सायबर गुन्हे देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेला धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या समस्यांकडे गंभीरपणे पहावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी केले

पणजी :

सायबर गुन्हे देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेला धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या समस्यांकडे गंभीरपणे पहावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी केले सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी सायबर योद्धे तयार करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये माहिती सुरक्षा, गोपनीयता आणि डिजिटल फॉरेन्सिक्स  या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला त्यांनी संबोधले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही. या आव्हानांसाठी कुशल तज्ञांची गरज आहे. सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडबद्दल जागरुकता, ज्ञान आणि कौशल्ये आणि सायबर सुरक्षा तसेच संगणक न्यायवैद्यकशास्त्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.'

मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार ५२,९७४ सायबर गुन्हे एकूण नोंदवले गेले आहेत, जे २०२० च्या तुलनेत नोंदणीमध्ये ५.९ टक्क्यांनी वाढ दर्शविते. २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांपैकी ६०.८ टक्के गुन्हे फसवणुकीचे होते.८.६ टक्के गुन्हे लैंगिक शोषण आणि ५.४ टक्के खंडणीचे होते.

सावंत म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात इंटरनेट आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या सकारात्मक बाजुही स्पष्ट झालेल्या आहेत. इंटरनेटने लोकांना जोडलेले राहण्यास, पेमेंट करण्यास, आवश्यक वस्तू खरेदी करण्यास आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे काम करण्यास मदत केली.'