शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खनिज खाणप्रश्नी अध्यादेश जारी करण्याबाबत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 17:49 IST

गोव्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला अध्यादेश जारी करण्यास भाग पाडण्याची भूमिका गोव्यातील काही मंत्री घेऊ लागले आहेत.

पणजी : गोव्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला अध्यादेश जारी करण्यास भाग पाडण्याची भूमिका गोव्यातील काही मंत्री घेऊ लागले आहेत. याबाबत सोशल मिडियावरून टीकेचा सूर सुरू झाला आहे.खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात अर्थ नाही हे गोवा सरकारमधील विविध मंत्र्यांना पटू लागले आहे. गोव्यातील सर्व खनिज लिजेसची मालकी 2020 सालापर्यंत तरी पूर्वीच्याच खाण कंपन्यांकडे कायम ठेवली जावी म्हणून केंद्र सरकारने वटहुकूम जारी करून एमएमडीआर कायदा दुरुस्त करावा अशा प्रकारचा विचार आता गोवा सरकारमधून पुढे येऊ लागला आहे. मंत्री तथा भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हा विचार उघडपणो बोलून दाखवला आहे.गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनच्या याचिकेवर निवाडा देताना गोव्यातील सर्व खनिज लिजेस रद्दबातल ठरवली. त्यामुळे 15 मार्चपासून गोव्यातील सगळा खनिज खाण व्यवसाय बंद झाला. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करूया असे गोवा सरकारने अगोदर ठरवले होते. सल्ल्यासाठी हा विषय देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल हरिष साळवे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. साळवे यांनी नुकताच गोवा सरकारला सल्ला दिला. एखाद्या राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली हा फेरविचार याचिकेचा मुद्दा होऊ शकत नाही व खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करून फारसे काही प्राप्त होऊ शकत नाही अशा अर्थाचे मत साळवे यांनी गोवा सरकारला कळविल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी आता वेगळा सुरू लावला आहे. फेरविचार याचिका सादर न करता आम्ही केंद्र सरकारला वटहुकूम जारी करण्याची विनंती करूया असे मंत्री सरदेसाई म्हणाले.सरकारमधील दुसरे एक ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनाही अध्यादेश काढण्याबाबतची विनंती योग्य वाटते. आम्ही गेल्या आठवडय़ात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो होतो. त्यावेळी शहा यांनी गोव्यातील खनिज खाणी सुरू व्हाव्यात म्हणून कोणताही पर्याय स्वीकारण्यास केंद्र तयार असेल असे आम्हाला सांगितले होते, असे डिसोझा म्हणाले. बेकायदा खनिज खाणींविरुद्ध लढणारे गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस म्हणाले, की सरकार वटहुकूम काढू पाहत असेल तर तो खाण कंपन्यांच्या हितासाठीच, अन्य लोकांसाठी नव्हे. खाण कंपन्या कामगार कपात करत असताना कंपन्यांचा पुळका सरकारला का? सरकारने महामंडळ स्थापन करून खाणी चालवाव्यात. दरम्यान, सोशल मिडियावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. केंद्र सरकारने अध्यादेश जारी करू नये. गोव्यातील खनिज खाणींचा लिलाव पुकारावा अशी मागणी नेटीझन्स करू लागले आहेत.

टॅग्स :goaगोवा