शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विरोधकांची घणाघाती टीका

By admin | Updated: March 25, 2015 01:40 IST

पणजी : तीन वर्षे उलटली, तरी सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकलेले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात प्रादेशिक आराखड्याचा उल्लेख नाही,

पणजी : तीन वर्षे उलटली, तरी सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकलेले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात प्रादेशिक आराखड्याचा उल्लेख नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी आभारदर्शक ठरावावरील चर्चेच्यावेळी विधानसभेत केली. बेकायदा बांधकामे, पक्षीय पातळीवर घेण्यात आलेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुका, ड्रग्स व्यवसाय आदी विषयांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात सर्वत्र स्वैर बांधकामे येत आहेत. पंचायत स्तरावर बेकायदा बांधकामांना ऊत आलेला आहे. राज्यात ६५ टक्के वनक्षेत्र असल्याचा दावा दिशाभूलकारक आहे. प्रादेशिक आराखड्याशिवाय विकासाला दिशा मिळणार नाही. नवा आराखडा गेला कुठे, असा सवाल राणे यांनी केला. बांधकाम, कृषी, वन यासाठी जमीन अधिसूचित करा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेतल्याबद्दल राणे यांनी टीका केली. १५ लाख लोकसंख्या असलेल्या राज्याला ही निवडणूक पक्षीय पातळीवर नकोच होती. ग्रामपंचायतींनाही विश्वासात घेतले नाही. राज्यात मच्छीमारी बांधवांना पुरेशा जेटी नाहीत. त्यांच्यासाठी कोणतेही नियोजन नाही. राज्य माहिती आयुक्त नेमण्याबाबत भाष्य नाही. गोवा हे माहिती हक्क कायदा राबविणारे पहिले राज्य असताना ही स्थिती का, असा सवाल राणे यांनी केला. स्वाईन फ्लूमुळे लोक बळी पडत आहेत. डॉक्टरांची पुरेशी व्यवस्था नाही. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे. १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना सेवेतून काढल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यांना सेवेत घ्या, असे आवाहन त्यांनी केले. किनारपट्टीतील ड्रग्स व्यवसायावर आळा घालण्यात सरकारला अपयश आले आहे. पोलीस यंत्रणा सक्षम करा. देशभरात अन्यत्र चर्चवर हल्ले होताहेत. अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे. पोलीस भरतीत कडक निकष लावा, असे राणे म्हणाले. (पान २ वर) सविस्तर वृत्तान्त/हॅलो १