शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय कार्यक्रमात झेंडावंदनाची जबाबदारी सभापतींवर सोपविल्याचे प्रकरण कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:42 IST

स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय कार्यक्रमात झेंडावंदन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सभापतींवर सोपविल्याचे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे.

पणजी : स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय कार्यक्रमात झेंडावंदन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सभापतींवर सोपविल्याचे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे.आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याला आक्षेप घेणारे पत्र लिहिले असून स्वेच्छा दखल घेऊन कोर्टाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या पत्राची प्रत भारताच्या सरन्यायाधीशांनाही पाठवण्यात आली आहे. चांगल्या प्रशासनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी तसेच घालून दिलेला शिष्टाचार पाळण्यासाठी हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे या पत्रात म्हटले आहे.आयरिश यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन करायचे असते. आणि मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकारमधील ज्येष्ठ मंत्री किंवा मुख्यमंत्र्याने नियुक्त केलेल्या अन्य मंत्र्याच्या हस्ते झेंडावंदन करायचे असते. मुख्यमंत्री पर्रीकर हे वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. परंतु त्यांनी अमेरिकेला जाताना ही जबाबदारी सभापतींवर सोपविली आहे. सभापती ही स्वतंत्र अधिकारिणी आहे सरकारचा भाग नव्हे, घटनात्मक चौकटीनुसार सभापतींनी नि:पक्षपाती असायला हवे, असा दावाही आयरिश यांनी केला आहे.१९९२ साली घटनापीठाने दिलेल्या निवाड्याचा हवाला देताना सभापती कसा निप:क्षपाती असायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. १९७३ पर्यंत स्वातंत्र्यदिनी राज्यपालांच्या हस्ते झेंडावंदन होत असे. मात्र फेब्रुवारी १९७४ मध्ये तामीळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे हा विषय नेला आणि कें द्राच्या अनुमतीनंतर १९७४ पासून स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्रीच झेंडावंदन करु लागले. सरकारने घटनेची चौकट पाळायला हवी. घटनेप्रमाणेच मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते याकडेही आयरिश यांनी लक्ष वेधले आहे.