शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

खाण लूट वसुलीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST

पणजी : राज्यात झालेल्या बेकायदा खाण व्यवसायाला जबाबदार धरून खाणमालकांकडून राज्य सरकार लूट वसूल करील,

पणजी : राज्यात झालेल्या बेकायदा खाण व्यवसायाला जबाबदार धरून खाणमालकांकडून राज्य सरकार लूट वसूल करील, अशी ग्वाही गेली तीन वर्षे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे जाहीरपणे देत आले, तरी विद्यमान सरकारने मात्र वसुलीचा हा विषय राज्याच्या अखत्यारित येतच नाही, अशी भूमिका आता घेतली आहे. खनिज निर्यातीबाबतची वसुली हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारा विषय असल्याची भूमिका आता प्रथमच राज्य सरकारने घेतली आहे. डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांचा तारांकित प्रश्न गुरुवारी विधानसभेत सादर झाला. मात्र, वेळेअभावी तो चर्चेस आला नाही. २००७ सालापासून २०१२ पर्यंत गोव्याच्या खाण क्षेत्रात झालेले घोटाळे शहा आयोगाने आपल्या अहवालातून दाखवून दिले आहेत. बेकायदा खनिज निर्यातीमुळे सुमारे ३५ हजार कोटींच्या महसुलाची हानी झाल्याचे शहा आयोगाचे म्हणणे यापूर्वी राज्यात बरेच चर्चेत आले आहे. आमदार सावळ यांनी बेकायदा खाणप्रकरणी आतापर्यंत सरकारने किती वसुली केली, असा थेट प्रश्न लेखी स्वरूपात मांडला आहे. त्यावर सरकारने दिलेले उत्तर धक्कादायक असल्याचे आढळून येत आहे. खाणमालकांकडून लुटीचा प्रत्येक पैसा वसूल करू, अशा गर्जना आतापर्यंत सरकार करत होते. तथापि, प्रत्यक्षात खाण व्यावसायिकांकडून पैसा वसूल करण्याची सरकारची तयारी नाही, हे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खाण खात्याचे मंत्री या नात्याने लेखी स्वरूपात सावळ यांच्या प्रश्नास उत्तर सादर केले आहे. शहा चौकशी आयोग केंद्र सरकारच्या खनिज मंत्रालयाने नेमला होता. आयोगाने वसुलीचा जो विषय सांगितला आहे, तो निर्यातीबाबतचा आहे आणि निर्यातीचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात नमूद केले आहे. राज्य सरकारला लागणारे विषय हे कायदेशीर स्वरूपाचे आहेत व त्या विषयांची हाताळणी सरकार जलदगतीने करत आहे, असेही उत्तरात म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)