शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिथिलतेवर कोर्टाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 20:43 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने अजूनही आपला अहवाल न दिल्याने दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी आपली नाराजी स्पष्ट करताना एका आठवडय़ात हा अहवाल सादर करण्याचा आदेश मंडळाला दिला.

मडगाव: न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही सोनसड्यावरील फोमेन्तो प्रकल्पात साचून राहिलेला कचरा नेमका कुठल्या स्वरुपाचा याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने अजूनही आपला अहवाल न दिल्याने दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी आपली नाराजी स्पष्ट करताना एका आठवडय़ात हा अहवाल सादर करण्याचा आदेश मंडळाला दिला.दरम्यान, या कामासाठी फोमेन्तो कंपनीने मडगाव पालिकेकडे जो इच्छाप्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाच्या मूळ प्रत आणि यासंबंधीची न्यायालयात सादर केलेली माहिती काही प्रमाणात वेगळी असल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. या दाव्याची पुढील सुनावणी आता 6 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. मंगळवारी ही सुनावणी झाली यावेळी फोमेन्तोचे वकील अॅड. गुरुदत्त मल्ल्या यांनी सोनसड्यावरील प्रकल्पात सुमारे एक हजार टन टाकाऊ कचरा साचून राहिलेला असून यामुळे नवीन कच-यावर प्रक्रिया करणो अशक्य झाले आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यावेळी पालिकेचे वकील अॅड. संदेश पडियार यांनी हा अहवाल त्वरित मिळावा यासाठी आपण स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांकडे पाठपुरावा केला तरीही हा अहवाल आपल्याला मिळू शकला नाही हे न्यायालयात स्पष्ट केले. यावेळी न्या. देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना मंडळाला अधिकृत पत्र पाठविण्याचा आदेश दिला. दोन सुनावणींच्या आधी न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोनसडय़ावरील कच-याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी चाचणी करावी आणि एका आठवडय़ात अहवाल द्यावा असे सांगितले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कच-याचे नमुनेही घेतले होते. मात्र या गोष्टीला महिना उलटला तरीही मंडळाचा अहवाल अजूनही सादर झालेला नाही. फोमेन्तोच्या म्हणण्याप्रमाणे हा कचरा टाकाऊ स्वरुपाचा असल्याने तो हटविण्याची जबाबदारी पालिकेची असून, पालिकेने ही जबाबदारी नाकारताना त्या कच-यात इनर्टचाही समावेश असून, इनर्ट साफ करण्याची जबाबदारी फोमेन्तोची असल्याची भूमिका घेतली आहे.दरम्यान, न्यायालयात फोमेन्तोने जी इच्छाप्रस्तावाची प्रत सादर केली आहे त्यात मूळ कागदपत्रतील कित्येक भाग वगळला गेला आहे तसेच उच्चाधिकार समितीच्या सुचनेवरुन फोमेन्तोने मुळ आराखडय़ात आपण काही बदल केले आहेत आणि त्यासाठीचा खर्च पालिकेने आपल्याला द्यावा अशी मागणी केली आहे. आणि त्यासाठी उच्चाधिकार समितीच्या एका बैठकीचे इतिवृत्त जोडले आहे. असे जरी असले तरी अन्य तीन बैठकांची इतिवृत्ते न्यायालयासमोर आणली नाहीत असा दावा अॅड. पडियार यांनी केला. आणि ही कागदपत्रे न्यायालयासमोर आणण्याची परवानगी मागितली. तीन दिवसात ही कागदपत्रे सादर करण्याचा आदेश यावेळी देण्यात आला.