शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : '...अन्यथा आमच्या शवपेट्या आणायची वेळ तुमच्यावर येईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:46 IST

CoronaVirus : जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत.

मडगाव: गेल्या 40 दिवसांपासून भारतीय समुद्रात असलेले मारेला डिस्कवरी हे जहाज उद्या( दि.२२) पुन्हा युरोपला जाण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे या जहाजावरील गोमंतकीय खलाशांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आम्हाला खाली उतरविण्याचा निर्णय एका दिवसात घ्या, अन्यथा आमच्या शवपेट्या घरी आणण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशारा या खलाशांनी दिला आहे.

या जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत. 40 दिवसांपूर्वी हे जहाज कोची बंदरात आले होते, त्यानंतर ते मुंबईला हलविण्यात आले. 40 दिवस उलटूनही भारतीय खलाशांना खाली उतरविण्या संदर्भात कसलाही निर्णय न झाल्याने आता ते परत युरोपात नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

या निर्णयामुळे धीर खचलेल्या गोमंतकीय खलाशानी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून आपली व्यथा मांडली आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, अजून आमची तब्येत उत्तम आहे. पण आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या युरोपात घेऊन गेल्यास स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित एका दिवसात काय तो निर्णय घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रश्नात केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली असून त्यांनी केंद्रीय मंत्री  श्रीपाद नाईक यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली आहे.

दुसरीकडे, जर या खलाशांना मुंबई बंदरावर उतरवता येत नसेल तर त्यांना मुंबईत असलेल्या कर्णिका या जहाजावर हलवावे. पण त्यांना कुठल्याही परिस्थिती युरोपात परत पाठवू नये, अशी मागणी सीफेरर असोसिएशन संघटनेने  केली आहे. या खलाशांना मुंबईतच उतरवून त्यांना तिथेच क्वारंटाइन करून ठेवावे, अशी मागणी काही जणांनी केली आहे, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या मुंबईत त्यांना ठेवण्यापेक्षा त्यांना आधी गोव्यात आणावे आणि नंतर त्यांना गोव्यातच विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी मागणीही होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा