शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 4000 पेक्षा अधिक खलाशी गोव्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:09 IST

एकूण 6 जहाजे भारताच्या दिशेने: आतापर्यंत 2564 जण गोव्यात

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: जगभरात अडकलेले 4000 पेक्षा अधिक खलाशी चालू पंधरवड्यात गोव्यात  येणार असून या खलाशाना घेऊन 6 जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत.

गोवा खलाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, काही जहाजे येत्या एक दोन दिवसात पोहोचणार आहेत तर काही जहाजे काहीशा विलंबाने  गोव्यात पोहोचतील.

सध्या गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि विदेशस्थ गोवेकरांना गोव्यात येण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून विदेशातून गोव्यात येणाऱ्याठी कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली असून जोपर्यंत चाचणीचा निकाल येत नाही तो पर्यंत त्यांना सशुल्क क्वारंटाईन करून गरजेचे असून त्यात जर निगेटिव्ह आढळल्यास त्यांना 14 दिवस घरात विलग अवस्थेत राहता येणार आहे.

गोव्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2304 खलाशी आणि वेगवेगळ्या 31 देशात अडकलेले 260 गोमंतकीय गोव्यात पोहोचले आहेत. वंदे भारत योजनेखाली दुबईहुन एक विमान गोव्यात आले. त्याशिवाय 11 चार्टर विमानातून खलाशी गोव्यात आले आहेत.

डिक्सन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आणखी काही चार्टर विमाने खलाशाना घेऊन गोव्यात येणार आहेत. सध्या या खलाशाना विलग करून ठेवण्यासाठी 31 हॉटेल्स बुक करण्यात आली असून 1819 खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भविष्यात गरज पडण्याची शक्यता असल्याने पांझरखणी कुंकळी येथील नूसी इस्पितळ सज्ज करून ठेवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

हुश्श! क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचेगोवा सरकारने विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी  नवीन एसओपी लागू केला असून जर कुणी निगेटिव्ह सापडल्यास त्याला 14 दिवस घरात विलग राहण्याची मोकळीक देण्यात आली आहे त्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हुश्श क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचे असे म्हटले. ते म्हणाले, या सरकारच्या निर्णयाला मागचे अडीच महिने गोव्यातून आणि गोव्याबाहेरून जे विरोध करत होते त्या गोयकारवादी शक्तीचा हा विजय असे ते म्हणाले.