शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

CoronaVirus News: 4000 पेक्षा अधिक खलाशी गोव्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:09 IST

एकूण 6 जहाजे भारताच्या दिशेने: आतापर्यंत 2564 जण गोव्यात

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: जगभरात अडकलेले 4000 पेक्षा अधिक खलाशी चालू पंधरवड्यात गोव्यात  येणार असून या खलाशाना घेऊन 6 जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत.

गोवा खलाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, काही जहाजे येत्या एक दोन दिवसात पोहोचणार आहेत तर काही जहाजे काहीशा विलंबाने  गोव्यात पोहोचतील.

सध्या गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि विदेशस्थ गोवेकरांना गोव्यात येण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून विदेशातून गोव्यात येणाऱ्याठी कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली असून जोपर्यंत चाचणीचा निकाल येत नाही तो पर्यंत त्यांना सशुल्क क्वारंटाईन करून गरजेचे असून त्यात जर निगेटिव्ह आढळल्यास त्यांना 14 दिवस घरात विलग अवस्थेत राहता येणार आहे.

गोव्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2304 खलाशी आणि वेगवेगळ्या 31 देशात अडकलेले 260 गोमंतकीय गोव्यात पोहोचले आहेत. वंदे भारत योजनेखाली दुबईहुन एक विमान गोव्यात आले. त्याशिवाय 11 चार्टर विमानातून खलाशी गोव्यात आले आहेत.

डिक्सन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आणखी काही चार्टर विमाने खलाशाना घेऊन गोव्यात येणार आहेत. सध्या या खलाशाना विलग करून ठेवण्यासाठी 31 हॉटेल्स बुक करण्यात आली असून 1819 खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भविष्यात गरज पडण्याची शक्यता असल्याने पांझरखणी कुंकळी येथील नूसी इस्पितळ सज्ज करून ठेवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

हुश्श! क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचेगोवा सरकारने विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी  नवीन एसओपी लागू केला असून जर कुणी निगेटिव्ह सापडल्यास त्याला 14 दिवस घरात विलग राहण्याची मोकळीक देण्यात आली आहे त्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हुश्श क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचे असे म्हटले. ते म्हणाले, या सरकारच्या निर्णयाला मागचे अडीच महिने गोव्यातून आणि गोव्याबाहेरून जे विरोध करत होते त्या गोयकारवादी शक्तीचा हा विजय असे ते म्हणाले.