शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 12:24 IST

घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले.

पणजी - कोविडची लागण झाली तरी, जर ताप किंवा तत्सम लक्षणो नसतील तर घरीच राहणो योग्य असा विचार करून राज्यातील एकूण सुमारे आठ हजार कोविडग्रस्त सध्या घरीच राहणो पसंत करत आहेत. काढा पिणो व अन्य उपाययोजना अशा रुग्णांकडून केली जाते. रोज सरासरी तीनशे कोविडग्रस्त घरी राहण्यासाठी शासकीय यंत्रणोकडून परवानगी मिळवत आहेत. सहसा परवानगी नाकारली जात नाही. काहीवेळा परवानगी उशिरा मिळते, असाही अनुभव कोविडग्रस्त सांगतात.घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. रविवारी 212 व्यक्तींनी होम आयसोलेशन स्वीकारले. 5 सप्टेंबर रोजी 405 कोविडग्रस्त घरी राहिले. 4 रोजी 270 कोविडग्रस्तांनी होम आयसोलेशन स्वीकारले. 3 रोजी 449 कोविडग्रस्तांना घरी राहण्यास परवानगी मिळाली. अशा कोविडग्रस्तांची एकूण संख्या  3 र्पयत 6 हजार 434 होती.कोविड निगा केंद्रात जाऊन राहणे आता कोविडग्रस्तांना आवडत नाही. जर शरीराला काही त्रास होऊ लागला तरच काहीजण कोविड निगा केंद्रात जातात किंवा इस्पितळात उपचारांसाठी जातात. जर दिवसाला एकूण पाचशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी साडेतीनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात. जर चारशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी सव्वा दोनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात अशा प्रकारचा सर्वसाधारण निष्कर्ष आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर काढता येतो.दरम्यान, आरोग्य खात्याने गेल्या काही दिवसांत कोविड चाचण्यांची संख्याच कमी केल्याने कोविडग्रस्त कमी संख्येने आढळू लागले आहेत. ज्या दिवशी सहाशे व सातशे कोविडग्रस्त आढळले होते तेव्हा दोन ते अडिच हजारांच्या चाचण्या केल्या गेल्या होत्या. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत प्रत्येकी अकराशे ते बाराशे एवढय़ाच कोविड चाचण्या करण्यात आल्या. कोविडग्रस्तांची संख्या कमी दिसावी म्हणून चाचण्या कमी करणे योग्य नव्हे असे खासगी क्षेत्रातील काही डॉक्टरांना वाटते. काही लोक सध्या कोणतीच कोविड लक्षणे दिसत नसतील तर चाचणी करून घेत नाहीत. घरात एखादा कोविडग्रस्त आढळला तरी, त्या घरातील अन्य सदस्य स्वत:हून चाचणी करून घेण्यास येत नाहीत. ताप वगैरे आला तर मग कोविड चाचणी करूया अशी भूमिका घेतली जाते.रुग्णांनी ताप आल्यानंतर तीन दिवसांच्या आत इस्पितळात येऊन उपचार सुरू करणो गरजेचे असते. ज्यांना अन्य आजार असतात, त्यांनी तर कोविडची बाधा होताच व ताप आल्याचे दिसून येताच तीन दिवसांच्या आत उपचार सुरू करायलाच हवेत असे गोमेकॉच्या डॉक्टरांचेही म्हणणो आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्या मते गेल्या काही दिवसांत अनेक बळी हे रुग्ण ऐनवेळी इस्पितळात आल्याने झाले आहेत. आठ दिवस अंगावर ताप काढल्यानंतर मग श्वास घेण्यास त्रस होऊ लागताच अनेकजण इस्पितळात धाव घेतात व त्यामुळे काहीजण चोवीस तासांतही इस्पितळात मरण पावतात असे राणो यांचे म्हणणो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा