शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

Coronavirus: गोव्यात पर्यटन सुरू करण्यासाठी आग्रह, दोनशे हॉटेलांकडून अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:08 IST

कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

पणजी : राज्याचे पर्यटन टप्प्याटप्प्याने सुरू केले जावे अशी मागणी गोवा टूर अॅण्ट ट्रॅव्हल असोसिएशनने शनिवारी सरकारकडे केली आहे. राज्यातील दोनशे हॉटेलांनी हॉटेल्स सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज केले पण सरकारने अजून मान्यता दिलेली नाही व हॉटेल्सही सुरू झालेली नाहीत असे संघटनेचे अध्यक्ष निलेश शाह यांनी नमूद केले आहे.

कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. गोव्यात हा परिणाम 40 टक्के आहे. त्या शिवाय अन्य अनेक परिणाम झाले आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. आणखी जास्त काळ हॉटेल्स किंवा पर्यटन बंद राहू शकत नाही. यामुळे बेरोजगारीत भर पडेल व महसुलाचीही हानी होईल. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यटन व्यवसाय खुला होत आहे. गोव्यातही त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वे व प्रक्रिया आणून हॉटेल्, बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला हवीत अशी मागणी संघटनेने केली आहे. बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला सरकारकडून परवानगी मिळाल्याशिवाय हॉटेल्सही खुली करता येत नाहीत. हॉटेल सुरू करताना बार व रेस्टॉरंट्सही खुली करण्यासाठी मान्यता मिळायला हवी, असे शाह यांनी म्हटले आहे.  राज्यात हजारो हॉटेल्स आहेत, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण सद्या दोनशेजणांनीच अर्ज केले आहेत. गेल्या 8 जून रोजी सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट्स खुली व्हावीत असे अपेक्षित होते. मात्र अर्ज सरकारने मागून घेतल्यानंतर त्या अर्जाना अजुनही मान्यता दिली गेलेली नाही यावर संघटनेने बोट ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन