शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

CoronaVirus गोव्यात अडकलेले ४५० विदेशी पर्यटक मायदेशी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:12 IST

कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतात २५ मार्च पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. इतर राज्याबरोबरच गोव्यातही याचे कडक रित्या पालन केले असून दाबोळी विमानतळावरून होणारी सर्व राष्ट्रीय व अंतरराष्ट्रय विमान सेवा सद्या रद्द करण्यात आलेली आहे.

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यातील विविध भागात अडकलेल्या ४५० विदेशी पर्यटकांना मंगळवारी (दि.३१) दाबोळी विमानतळावरून दोन खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावरून ‘एअर इंडीया’ च्या खास विमानाने ३१७ फ्रेंकफट, जर्मनी येथील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले तर संध्याकाळी ‘रोशीया एअरलाईंन्स’ च्या खास विमानाने १३३ पर्यटकांना मॉस्को, रशिया येथे पाठवण्यात आल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली.

कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतात २५ मार्च पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. इतर राज्याबरोबरच गोव्यातही याचे कडक रित्या पालन केले असून दाबोळी विमानतळावरून होणारी सर्व राष्ट्रीय व अंतरराष्ट्रय विमान सेवा सद्या रद्द करण्यात आलेली आहे. सदर लॉकडाऊन मुळे गोव्यात विविध राष्ट्रातील सुमारे दोन हजार पर्यटक अडकून राहील्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सोमवारी (दि. ३०) देऊन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी सात खास विमाने येणार असल्याचे कळविले होते. मंगळवारी (दि. ३१) पहाटे ५.३० च्या सुमारास दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘एअर इंडीया’ च्या खास विमानातून ३१७ विदेशी पर्यटकांना फ्रेंकफट, जर्मनी येथे त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली. तसेच संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘रोशिया एअरलाईंन्स’ च्या खास विमानातून १३३ प्रवाशांना मॉस्को, रशिया येथे पाठवण्यात आले. लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकलेल्या ४५० विदेशी पर्यटकांना मंगळवारी त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून लवकरच राहीलेल्या पर्यटकांना मायदेशी पाठवण्याकरिता खास विमाने गोव्यात येणार असल्याचे गगन मलिक यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी (दि. ३०) रात्री दाबोळी विमानतळावरून अन्य एका खास विमानातून इस्त्राईल राष्ट्रातील काही प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली.

२५ मार्च पासून लॉकडाऊन झाल्यानंतर अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर सहा खास विमाने दाखल होऊन युनायटेड किंगडम, झेक प्रजासत्ताक, रशिया, इस्त्राईल अशा विविध राष्ट्रातील ९३० विदेश पर्यटकांना घेऊन त्यांच्या मायदेशी गेली असल्याची माहीती विमानतळ सूत्रांकडून उपलब्ध झाली. यात ५ चिमुकल्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी कळविले. सोमवारी रात्री व मंगळवारी अशा २४ तासाच्या काळात दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या तीन खास विमानातून विदेशी प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठविल्यानंतर दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने कोरोना विषाणूची पसरण होऊ नये याकरिता विविध प्रकारच्या खबरदारी बाळगल्याचे दिसून आले. दाबोळी विमानतळ कर्मचाऱ्यांनी विमानतळ टर्मिनल इमारतीत असलेल्या सर्व वस्तूंची साफसफाई करण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य विविध पावले उचलली असे संचालक गगन मलिक यांनी माहीतीत कळविले. तसेच दाबोळी विमानतळावरून या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये यासाठी विविध प्रकारची सुरक्षेची पावले उचलण्यात आलेली असल्याचे संचालक गगन मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या