शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

CoronaVirus News in Goa : गोव्यात प्रवाशांची कोरोना चाचणी करणे आव्हानदायी, 14 हजार चाचण्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 14:33 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : गोव्यात एकूण चौदा हजार कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यात कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत गेली आहे. गुरुवारपर्यंत चौदा हजारपेक्षा जास्त चाचण्या पार पडल्या.

- सदगुरू पाटील

पणजी : गोव्यात रस्तामार्गे, रेल्वेद्वारे किंवा विमानाने येणा-या प्रत्येक व्यक्तीची कोरोना (कोव्हिड-19) चाचणी केली जाईल असे सरकारने जाहीर केले तरी, प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे हे आव्हानदायी असल्याचे आरोग्य यंत्रणेशी निगडीत विविध घटकही मान्य करतात. गोव्यात एकूण चौदा हजार कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

रस्ता मार्गे राज्यात रोज सरासरी चारशे लोक गोव्यात येतात. त्या प्रत्येकाची चाचणी केली जाईल पण अनेक ट्रकांमधून चालकांकडून अन्य काही व्यक्तींनाही गोव्यात आणले जाते. ह्या व्यक्ती तपास नाक्यावरील पोलिसांना चुकविण्यासाठी मध्येच कुठे तरी उतरतात व मग जंगलातून थोडे चालत आडवाटेने गोव्यात येतात. अशा व्यक्तींची कोरोना चाचणी होऊ शकणार नाही.

सत्तरी- डिचोली अशा तालुक्यांमधून तसेच, मोलेच्या भागातून आडवाटेने गोव्यात प्रवेश करणारे संख्येने कमी नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सीमेवर प्रत्यक्ष चाचणी होणार नाही. सीमेवर फक्त संबंधित व्यक्तीचे थ्रोट स्वॅब गोळा केले जाईल व त्या व्यक्तीची सगळी माहिती लिहून ठेवून त्या व्यक्तीला घरी किंवा त्याच्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊ दिले जाईल.

जर त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरच त्या व्यक्तीला पुन्हा शोधले जाईल. तोपर्यंत ही व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आली व किती ठिकाणी फिरली याची कोणतीही माहिती आरोग्य खात्याच्या यंत्रणोकडे नसेल. तशी माहिती ठेवणे हे अशक्यच काम आहे, हे आरोग्य खात्याचे काही कर्मचारी व पोलिसही मान्य करतात. 

रेल्वे किंवा विमानातून जे प्रवासी येतील, त्यांच्याबाबतही असेच घडणार आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना याविषयी 'लोकमत'ने विचारले असता, प्रत्येकाला आम्ही गोव्यात आल्यानंतर अगोदरच क्वारंटाईन करून ठेवू शकत नाही. थ्रोट स्वॅब गोळा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढे जाऊ द्यावेच लागेल. चाचणी अहवाल येईपर्यंत आम्ही प्रत्येक व्यक्तीला अडवून ठेवू शकत नाही. सहा तास तरी अंतिम अहवाल येण्यासाठी लागतात. प्रत्येकाला क्वारंटाईन करण्यासाठी रोज मोठ्या संख्येने जागा लागतील. ते शक्य नाही, असे राणे म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत गेली आहे. गुरुवारपर्यंत चौदा हजारपेक्षा जास्त चाचण्या पार पडल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा