शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्याचा परिणाम

By admin | Updated: November 9, 2015 01:23 IST

पणजी : भाजपने मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्यास काय घडू शकते हे बिहारच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असा

पणजी : भाजपने मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्यास काय घडू शकते हे बिहारच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असा टोला सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष मंत्री दीपक ढवळीकर यांनी हाणला. दिवाळीनंतर पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असून २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती ठेवावी की नाही याबाबत चर्चा होईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मित्रपक्ष असल्याने मगोची अपेक्षा आहे की भाजपने प्रत्येक कामात विश्वासात घ्यायला हवे; परंतु तसे होताना दिसत नाही. बिहारमध्ये याच प्रवृत्तीचा परिणाम भाजपला भोगावा लागला आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मगोची काय भूमिका असणार आहे, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. गोव्यात परिणाम नाहीच : विनय तेंडुलकर बिहारच्या निकालांचा गोव्यात कोणताही परिणाम होणार नाही; कारण येथे भाजपचे काम तळागाळापर्यंत पोचले आहे, असा दावा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘पक्षाने बिहारमधील पराभव मान्य केला आहे. त्यातून बोधही घेऊ. नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव हे दोन माजी मुख्यमंत्री एकत्र आले. या दोघांचीही स्वत:ची व्होट बँक तेथे आहे, त्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. काही राज्यांमध्ये भाजप अजून तळागाळापर्यंत पोचलेला नाही. गोव्यात तशी स्थिती नाही. येथे बुथ स्तरापर्यंत पक्षाचे काम पोचलेले आहे. सध्या राज्यात पक्षाचे अभ्यासवर्ग चालू आहेत. रविवारी दक्षिण गोव्यातील पाच मतदारसंघांसाठी झालेल्या अभ्यासवर्गांना मी उपस्थित होतो. सर्वत्र भाजपला चांगला प्रतिसाद आहे.’ (प्रतिनिधी)