शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

फुटीर आमदाराच्या नोकऱ्यांबाबत विधानावरुन गोव्यात काँग्रेसचा प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:38 IST

दयानंद सोपटे यांनी नोक-यांबाबत जे विधान केले आहे, त्याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. एक तर तक्रार करण्याची किंवा कोर्टात जाण्याची तयारीही पक्षाने चालवली आहे. ‘आमदार फोडण्यासाठी सरकार नोक-यांची खिरापत वाटत असेल तर ती गंभीर बाब आहे. 

पणजी : दयानंद सोपटे यांनी नोक-यांबाबत जे विधान केले आहे, त्याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. एक तर तक्रार करण्याची किंवा कोर्टात जाण्याची तयारीही पक्षाने चालवली आहे. ‘आमदार फोडण्यासाठी सरकार नोक-यांची खिरापत वाटत असेल तर ती गंभीर बाब आहे. पात्रता असलेल्यांनाच नोक-या मिळायला हव्यात. भरतीची प्रक्रिया सरकार योग्यप्रकारे पार पाडत आहे का, हा देखील प्रश्न असून सोपटे यांना नोक-या देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने आता या प्रकरणाच्या मुळाशी काँग्रेस जाणार आहे.’, असे आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते असतात मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्रपतींकडे तक्रारी केल्या. आता आम्हीही तक्रारींचा पर्याय खुला ठेवला असून प्रसंगी न्यायालयातही जाऊ.’ सोपटे यांनी रविवारी मांद्रे मतदारसंघातील बैठकीत सरकारने आपल्याला नोक-यांचे आश्वासन दिल्याचे जाहीर केले होते.रेजिनाल्द पुढे म्हणाले की, ‘केंद्रात संपुआचे सरकार सत्तेवर असताना पर्रीकर भूसंपादन विधेयकाविरोधात आवाज काढत होते. परंतु मोपा विमानतळासाठी त्यांनी घाईगडबडीत जमीन संपादित केली. तेथे जमीनमालकांना पुरेशी भरपाईही दिलेली नाही. सुभाष शिरोडकर यांच्या जमिनीसाठी तब्बल ७0 कोटी रुपये दिले आणि ही जमीन खरेदी करताना ती कोणत्या कामासाठी घेतली जात आहे याची कारणही दिले नाही.’

आयपीबीच्या बैठकीचे गौडबंगालगुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाल्याचा जो दावा केला जात आहे त्यावर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी संशय व्यक्त केला. ज्या पध्दतीने घिसाडघाईने प्रकल्पांना मान्यता देण्यात आली त्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संचालकांची लपवाछपवी चालली आहे, असा आरोप कवळेकर यांनी केला.

मी काँग्रेसमध्येच : प्रतापसिंह राणेमी काँग्रेसमध्येच आहे आणि कुठेही जाणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आपण कॉंग्रेसशी एकनिष्ठ असल्याचा दावा केला. पक्षामधून फुटणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. प्रसार माध्यमांनी अशी वृत्ते देण्याआधी शहानिशा करायला हवी, असे ते म्हणाले. राणे एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, राज्यात सरकारच अस्तित्त्वात नाही. प्रशासन आहे कुठे? असा उलट सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे आणखी तीन आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या