शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निलंबित ठेवण्यास काँग्रेसचा विरोध, आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:35 IST

गोवा विधानसभेत १४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्तास्थापनेसाठी या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, या मागणीसाठी आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर पोहोचले आहे.

पणजी : गोवा विधानसभेत १४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्तास्थापनेसाठी या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, या मागणीसाठी आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर पोहोचले आहे. विधानसभा निलंबित ठेवण्याच्या हालचालींना पक्षाने विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले की, कॉंग्रेसचे १४ ही आमदार एकसंध असून राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र देण्यासाठी काहीच वेळात आम्ही आलो आहोत.ते म्हणाले की, 'घटक पक्षांचा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाच पाठिंबा होतात. राज्यपालांना दिलेल्या पत्रातही त्यावेळी घटक पक्षांनी तसे म्हटले होते. पर्रीकर यांच्या निधनाने आता घटक पक्ष सरकार सोबत नाहीत असा याचा अर्थ होतो आणि संख्याबळानेही काँग्रेसच विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असल्याने काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण देणे आवश्यक ठरते. या मागणीचे पत्र आम्ही रविवारी सायंकाळी राज्यपालांना पाठवले आहे परंतु अजून त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली नाही.'रविवारी सायंकाळी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात कवळेकर म्हणतात की, काँग्रेसकडे १४, भाजपकडे ११, गोवा फॉरवर्डकडे ३, मगोपकडे ३, अपक्ष ३ राष्ट्रवादी १ आणि सभापती १, असे संख्याबळ सध्या विधानसभेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींनी गती घेतल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक रविवारी सायंकाळी उशिरा झाली या बैठकीला रात्री दिल्लीहून परतलेले आमदार दिगंबर कामत हेही उपस्थित होते. रविवारी दिवसभर दिगंबर हे भाजपाप्रवेश करणार असल्याच्या अफवा होत्या. परंतु रात्री बैठकीला ते हजर राहिल्याने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे सर्व १४ आमदार एकत्र असल्याचा दावा बाबू कवळेकर यांनी केला आहे. दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कायदेशीर पर्यायी पक्ष समोर खुले असल्याचे सांगितले ते म्हणाले की, पत्रे देऊनही राज्यपाल कोणताही प्रतिसाद देत नाहीत. भाजपकडे केवळ ११ आमदार उरले असून तो पक्ष अल्पमतात गेला आहे. राज्यपालांनी विधानसभा निलंबित ठेवू नये किंवा राष्ट्रपती राजवट लावली जाऊ नये, अशी आमची ठाम मागणी आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर