शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, गोव्यात काँग्रेस विधिमंडळाची मागणी : खाण प्रश्नी अभ्यासार्थ समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 20:23 IST

खाण अवलंबितांवर सोमवारी झालेल्या लाठीहल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाने घेतला.

पणजी : खाण अवलंबितांवर सोमवारी झालेल्या लाठीहल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाने घेतला. खाणींच्या विषयी अभ्यासार्थ प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच आमदारांची समितीही स्थापन करण्यात आली असून खाणी चालू रहाव्यात यासाठी कायदेविषयक सल्ला तसेच अन्य गोष्टी ही समिती करणार आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स तसेच आमदार नीळकंठ हळर्णकर हेही उपस्थित होते. कवळेकर म्हणाले, की सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने खाण अवलंबितांना रस्त्यावर यावे लागले. दोन्ही पुलांच्या परिसरात १४४ कलम लागू असताना आंदोलकांना आधी आत येऊ दिले आणि नंतर त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. लाठीहल्ल्याचा हा आदेश दिला कोणी? असा सवालही त्यांनी केला. राज्यातील ८८ खाण लीज रद्द करुन या लिजेस लिलांवात काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी दिला होता त्यानंतर दीड महिना सरकारने काहीच केले नाही, असा आरोपही कवळेकर यांनी केला. ते म्हणाले की, या प्रश्नावर सरकारने लोकांची निव्वळ दिशाभूलच केली. सरकारनेच अवलंबितांवर रस्त्यावर येण्याचा प्रसंग आणला. याआधी एलईडीच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्या मच्छिमारांवरही पोलिसांनी बेछूट लाठीहल्ला चढवला होता. विरोधकांच्या मागणीनंतर स्वप्निल नाईक यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली परंतु या समितीने काय अहवाल दिला किंवा पुढे काय झाले हे कोणालाच ठाऊक नाही. खाणींच्या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका सादर करण्यात येणार असल्याचे सरकार सांगत आहे परंतु विरोधकांना याचिकेचा मसुदा दाखवल्याशिवाय तसेच याबाबतीत पूर्ण विश्वासात घेतल्याशिवाय ही याचिका सादर करु नये, अशी मागणी कवळेकर यांनी केली. खाणप्रश्नी अभ्यासार्थ स्थापन केलेल्या समितीत आमदार दिगंबर कामत, रेजिनाल्द लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर, विल्फ्रेड डिसा यांचा समावेश आहे. 

 रस्त्यांच्या कामांमध्येही गौडबंगाल : आरोप अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चाललेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये गौडबंगाल असल्याचा काँग्रेसला संशय आहे. या प्रश्नावर आमदार रवी नाईक, रेजिनाल्द लॉरेन्स, विल्फ्रेड डिसा व दयानंद सोपटे यांची चार सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. रेजिनाल्द यांनी राज्य सरकार नेतृत्त्वहीन बनल्याची टीका केली. राज्याला गृहमंत्री नाही. १४४ कलम लागू होते तर आंदोलकांना आधीच अडवायला हवे होते. त्यांना आत का येऊ दिले, असा सवाल त्यांनी केला.